स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर

Date:

पुणे-स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर झाले आहेत . या संदर्भात ‘अण्णा हजारे यांनी म्हटले आहे कि,’जीवनात स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातून मानवी जीवनाचा अर्थ कळत गेला. मानव सेवा हीच इश्वर सेवा हे समजल्याने आपल्या जीवनातही जे काही कर्म करावयाचे ते निष्काम भावनेने, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता समाजातील दिन-दुबळे, रंजले-गांजलेले व उपेक्षित जीवन जगणाऱ्यांसाठी कार्य करायचे असा ठाम निर्णय वयाच्या १७ व्या वर्षी भर तारूण्यात घेतला. तथापि हे कार्य उपाशी पोटी हे कसे करणार? व स्वतःचा भार इतरांवर पडू नये या करिता सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला. १९६२ साली झालेल्या चीन युद्धात सैनिकांची जीवीत हानी मोठ्या प्रमाणावर झाल्याने भारतीय सैन्य दलात १९६३ साली दाखल झालो. पुढे देश सेवा करीत असताना सन १९६५ मधील पाकिस्तानच्या आक्रमणात माझ्या बरोबरीने काम करणारे अनेक जवान शहीद झाले. सुदैवाने मी वाचलो गेलो ही इश्वराची कृपा, व पुनर्जन्म समजून पेन्शन मिळेपर्यंत देश सेवा केली.

दरम्यान महात्मा गांधीजींची पुस्तके वाचत गेलो व कामाला सुरवात केली. जन्मभर अविवाहीत राहूनच हे कार्य करता येईल म्हणून आजन्म ब्रम्हचारी व्रताचे पालन केले. मंदीरात वास्तव्यास राहिलो. देश बदलायचा असेल तर देशाचा घटक गाव, गावाचा घटक कुटूंब व कुटूंबाचा घटक प्रत्येक व्यक्ती बदलल्याशिवाय देशाचा विकास साध्य होणार नाही.

या भावनेने समविचारी सहकाऱ्यांचे संघटन बांधणी करून स्वतःच्या गावातून कार्याला सुरूवात केली. गावात कार्य करताना श्रमदान, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, नसबंदी या पंचसुत्रीचा अवलंब केला. प्रसंगी राज्यात व देशातील समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर अनेक वेळा उपोषणे आणि आंदोलने करावी लागली. त्यातून देशातील जनतेला १) माहितीचा अधिकार, २)शासकीय बदल्यांचा कायदा, ३) ग्रामसभेला जादा अधिकार कायदा ४) दप्तर दिरंगाईचा कायदा ५) नागरिकांची सनद ६)जनलोकपाल कायदा ७)ग्रामरक्षक दल ८) महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक यांसारखे कायदे मिळाले. गावातील प्रत्येक समस्येवर विचार विनिमय करून त्यावर मार्ग व उपाय शोधण्यात आले. उदा. जलसंधारण, शिक्षण, पर्यावरण, पशुसंवर्धन इ. बाबींवर कार्य करण्यात आले. त्याचा लाभ गावकऱ्यांना मिळत गेला व या सर्व कार्यांचा प्रचार व प्रसार वाढत जाऊन तालुका, जिल्हा, राज्य, देश, आणि विदेशातही होत गेला.

वरील कार्याची नोंद घेऊन समाजातील वेगवेगल्या स्तरातील भेटी देणारे लोक, तसेच वेगवेगळ्या संस्था, शासन, देश व परदेशातूनही पुरस्कार मिळत गेले.

समाजाकडून मिळालेली ही रक्कम समाजालाच परत करायची यासाठी सन १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या संस्थेची स्थापना करून समाजामध्ये निष्काम भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती तथा संस्था यांना प्रेरणा मिळावी म्हणून वरील संस्थेच्या माध्यमातून प्रती वर्षी हे पुरस्कार दिले जात आहेत. मिळालेल्या पुरस्कारांची एकूण रक्कम १,६७,०००००/- (एक कोटी सदुसष्ट लक्ष रू.) बँकेत कायम स्वरूपी ठेवी ठेवून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून प्रती वर्षी पुरस्कार प्रदान केले जात आहेत.

या वर्षी सन २०२५-२६ च्या वर्षीचे पुरस्कार, संस्थेच्या निवड समिती मार्फत दिनांक २३ मार्च २०२६ या शहिद दिनी जाहीर करण्यात येऊन, प्रत्यक्ष वितरण कार्यक्रम दि.१५ जून २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ पूर्वक, मानपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्काराची रक्कम प्रदान केली जाणार आहे.

सन २०२५-२६ च्या पुरस्काराचे मानकरी

अ.क्र.पुरस्काराचे मानकरीपुरस्काराची रक्कम
मा. श्री यजुर्वेंद्र महाजन- दिपस्तंभ फाऊंडेशन (मनोबल), जि. जळगाव२,००,०००/-
मा. श्री दिपक नागरगोजे, शांतीवन प्रकल्प, आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड१,५०,०००/-
मा. श्री. शिवाजीराव डोळे, (माजी सैनिक) व्यंकटेश्वरा को- ऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लि. अंजग-वडेल ता. मालेगाव, जि. नाशिक१,००,०००/-
मा. श्री अनंत झेंडे- महामानव बाबा आमटे सेवा संस्था, चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर१,००,०००/-
मा. श्री डॉ नंदू पालवे- सेवा संकल्प प्रतिष्ठान, बेलखेड ता. चिखली, जि. बुलढाणा१,००,०००/-
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे औंध...

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा ‘मोगरा फुलला’सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

पुणे, दि. 23: राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष...

जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम बनवा – सुनील माने

पुणे : महाराष्ट्राचा एपस्टीन ढोंगी बाबा अशोक खरात...

महावितरणच्या वीजसेवा आता ‘व्हॉट्सॲप’वर

वीजबिलाची माहिती, भरणास‍ह तक्रार नोंदविण्याचीही सोय पुणे, दि. २३ मार्च...