होर्मूज मधून भारतीय नौका सोडण्याचे श्रेय इराण कडून भारतीय जनतेस..!

Date:

इराण प्रतिनिधी मंडळाचा खुलासा सत्य वास्तवतेवर आधारित …..
⁃ काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे –

देशाचे (भाषणजीवी) पंतप्रधान मोदी हे देशहिताचे निर्णय तत्परतेने घेत नाही, तेंव्हा ‘जनता आणि विपक्ष विदेशनीती हातात घेऊन राष्ट्रहित जपते’ याचा प्रत्यय ईराण’च्या निर्णय प्रक्रियेतून आल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
इराणने भारताचे दोन जहाज होर्मुज मधून सोडताना भारत सरकार’चा स्पष्ट अनुल्लेख करून, संपूर्ण श्रेय स्पष्टरित्या ‘भारतीय जनतेला’ दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारताचा जुना मित्र इराणला जेंव्हा दुष्ट प्रवृत्तीचा इज्राइल धमक्या देत होता, तेंव्हा असंख्य देशांनी अटक वारंट काढलेल्या इज्राइलच्या नेतान्याहूने पंतप्रधान मोदींना तातडीने बोलावून घेतले व एक मेडल (पुरस्कार) *बहाल केला (गळ्यात बांधला) आणि आपल्या कुकर्मांना भारताची अप्रत्यक्ष स्वीकृती मिळवून घेत, दुसऱ्या दिवशी इराणवर इज्राइल आणि अमेरिकेने हल्ला केला, इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनींना मृत्यूस सामोरे जावे लागले, मात्र पारंपरिक मित्र असलेल्या भारत सरकारने, साधा शोक संदेश ही तत्परतेने दिला नसल्याचा तर *अत्यंत विलंबाने दिल्याचा आरोप ही त्यांनी केला.
भारतीय जनता’ मात्र इराणवर झालेल्या या अत्याचारामुळे दुखावली, इराणचे समर्थन आणि शहिद अली खोमेनी यांच्या समर्थनार्थ शोक संदेशांचा देशात पाऊस पडला.
भारत सरकारच्या अश्या वागण्यामुळे दुखावलेला इराण, ‘भारतीय जनतेच्या प्रेमाने’ मात्र निश्चितच सुखावला.
तसेच, इराण’चे पूर्णतः निशस्त्र युद्धक जहाज भारताच्या आमंत्रणावर विशाखापट्टण येथे आले होते, त्याच्या सैनिकांनी विशाखापट्टणमच्या रस्त्यावर भारतीय राष्ट्रपतींना सलामी दिली मात्र परतीच्या प्रवासात (भारताच्या जवळच) अमेरिकेने युद्ध नियम धाब्यावर ठेऊन, या निःशस्त्र जहाजाला बुडवले. जहाजातून आपत्तीचा एसओएस कॉल प्रथम भारताला देण्यात आला होता पण भारत सरकारला बुडणाऱ्या इराणी प्रवाशांना वाचवण्याची कदाचित अमेरिकडून अनुमती मिळाली नसावी म्हणूनच भारत सरकारने वा सैन्याने पावले उचलली नसावीत अशी उपहासात्मक टिका ही काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
त्याचवेळी लहानशा श्रीलंकेने मात्र कसल्याही अनुमतीची पर्वा न करता आपल्या छोट्याश्या कुवतीने जमेल तितक्या इराणी लोकांना वाचवले याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.
भारत सरकारने पुन्हा साधा ‘शोक संदेश’ ही दिला नाही का अमेरिकेच्या दबावाखाली भारत सरकार हे करू शकले नाही.. (?) असा संतप्त सवाल की काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
भारतीय जनता पुन्हा हळहळली, शोक संदेशांचा आणि आपल्याच सरकारच्या निर्भर्त्सनेचा देशात विविध माध्यमांवर पाऊस पडला. देशाच्या विदेशनीतीची व भारताच्या सार्वभौमत्वाची अशी दुर्गती पाहून, विपक्षाने सूत्रे आपल्या हातात घेतली.
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी यावर देशातील प्रमुख माध्यमातून विस्तृत लेख लिहून, ‘सद्य स्थितीतील भारत सरकारची नीती ही भारताची नीती नाही, भारतीय जनतेची ही नीती नाही, हा भारतीय जनमानसाचा दृष्टिकोन नाही, हे साऱ्या जगासमोर विशेषतः इराणसमोर स्पष्ट केले.
त्याचीच् परिणीती म्हणजे इराणने भारताचे दोन जहाज होर्मुजतून सोडले आणि हा ‘मित्रत्वाचा, संवेदनशीलता व आत्मियतेचा* भाव’ भारत सरकार मुळे नसून ‘भारतीय जनतेचा’ आहे हे अगदी इराण’ने स्पष्ट शब्दात सांगितले.
अश्या रितीने भारतातील जनता आणि विरोधी पक्ष’ यांनी विदेश नीतीत कृतीशील पुढाकार घेऊन युद्धजन्य परिस्थितीत ‘भारतास संभाव्य ऊर्जा संकटपासून काही काळ वाचवण्याचा प्रयत्न केला’ याचे श्रेय काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या व लोकसभेच्या माजी विरोधीपक्ष नेत्या श्रीमती सोनियाची गांधी यांना व देशातील संवेदनशील व मानवतावादी ईराणप्रेमी सामाजिक घटकांना जात असल्याचे काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद?: हर्षवर्धन सपकाळ

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी...

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

हिंदू नववर्षानिमित्त समाजात एकोपा, जिव्हाळा आणि प्रगतीचे वातावरण निर्माण...

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे;उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील पुणे- जिल्हा...

सांस्कृतिक कार्य विभागाचा गौरवशाली उपक्रम : प्रथम क्रमांकाचा चित्ररथ गिरगावात प्रदर्शनासाठी

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई, दि....