धर्मांतरविरोधी कायदा सर्वात वाईट:असदुद्दीन ओवेसी यांची टीका

Date:

मुंबई-महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वरून राजकीय वातावरण तापले आहे. अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकावर तीव्र टीका केली आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये लागू असलेल्या धर्मांतर विरोधी कायद्यांपेक्षाही महाराष्ट्राचा प्रस्तावित कायदा अधिक कठोर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सामाजिक माध्यमावर केलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी या विधेयकाला सर्वात वाईट, अशा कायद्यांपैकी एक असे संबोधले. त्यांच्या मते, अशा प्रकारचे कायदे खऱ्या अर्थाने स्वेच्छेने होणाऱ्या धर्मांतरालाही गुन्हा ठरवू शकतात.

ओवेसी यांनी सांगितले की, अनेक राज्यांतील धर्मांतर विरोधी कायद्यांमुळे आधीच आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांवर दबाव निर्माण होतो. धर्मांतर करण्यासाठी आधी परवानगी घेण्याची अटही काही ठिकाणी आहे. आता महाराष्ट्रातील प्रस्तावित कायद्यात आणखी काही कठोर तरतुदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः ‘शिक्षणाद्वारे ब्रेनवॉश करून धर्मांतर घडवणे’ या शब्दप्रयोगावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते हा शब्दप्रयोग अतिशय व्यापक आणि अस्पष्ट असल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात उदाहरण देताना ओवेसी म्हणाले की, एखादी व्यक्ती एखाद्या धर्माचा पवित्र ग्रंथ वाचते किंवा एखाद्या विद्वान व्यक्तीकडून त्या धर्माविषयी माहिती घेते, तर त्यालाही ‘ब्रेनवॉश’ मानले जाईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे लोकांना मनमानी पद्धतीने अटक करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे या विधेयकाचा उद्देश लोकांना घाबरवणे आणि धर्मांतराच्या स्वातंत्र्यावर बंधने आणणे असा असल्याचा आरोप त्यांनी केला.

या विधेयकातील आणखी एका तरतुदीवरही ओवैसी यांनी टीका केली आहे. प्रस्तावित कायद्यानुसार पोलिसांना कोणतीही तक्रार नोंदवली नसतानाही संशयित बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणात स्वतःहून कारवाई करण्याचा अधिकार दिला जाणार आहे. याचा अर्थ असा की, एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनीही आक्षेप घेतला नसला तरी पोलिसांना त्या प्रकरणात अटक करण्याची मुभा मिळू शकते, असे त्यांनी म्हटले. अशा तरतुदीमुळे नागरिकांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप होण्याचा धोका असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ओवेसी यांनी या प्रस्तावित कायद्याला संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचेही म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने खासगी आयुष्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले असून त्यामध्ये व्यक्तीला कोणता धर्म स्वीकारायचा किंवा स्वीकारायचा नाही याचे स्वातंत्र्यही समाविष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. संविधानाच्या प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास आणि उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे, याची आठवण त्यांनी करून दिली.

आंबेडकरांनी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होतामहाराष्ट्र ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी असून त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, याकडेही ओवेसी यांनी लक्ष वेधले. दरम्यान, राज्याच्या विधानसभेत ग्रामीण विकास राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडले असून बेकायदेशीर धर्मांतर रोखणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. प्रस्तावित कायद्यानुसार काही गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असणार असून नियमांचे पालन करून स्वेच्छेने धर्मांतर करण्यास परवानगी दिली जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतात एका वर्षात 24 अब्जाधीश वाढले: लक्ष्मी मित्तल दररोज ₹274 कोटी कमावून देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

नवी दिल्ली-फोर्ब्स वर्ल्ड्स बिलियनेअर्स 2026 च्या यादीनुसार, भारतात एका...

ट्रम्प यांची रविवारी नाटो (NATO) देशांना धमकी

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील इंधन टॅंकवर हल्ला:अनेक उड्डाणे डायव्हर्ट, ट्रम्प...

मसाप मध्ये सत्तापालट :साहित्य संवर्धन ला बहुमत

मिलिंद जोशी ,सुनीताराजे पवार यांचा पराभव करत योगेश सोमण...