गॅसचा तुटवडा भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, दांडी मार्चची प्रेरणा घेऊन आंदोलन करण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ

Date:

विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम, विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय.

मुंबई/त्र्यंबकेश्वर, दि. १२ मार्च २०२६

आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला भाजपा सरकारचे चुकीचे धोरण व नाकर्तेपणामुळे झाला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला भासत आहे. इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० साली दांडी मार्च काढून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले होते, त्याची प्रेरणा घेऊन जनतेने आज आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, देशात स्वातंत्र्य चळवळ सुरु असताना महायुद्धाला सामोरे जावे लागले, स्वातंत्र्यानंतरही जगाच्या अनेक भागात अशा प्रकारच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले पण त्यावेळी काँग्रेस सरकारने, तत्कालीन पंतप्रधान यांनी राष्ट्र म्हणून सर्वांशी संवाद साधत ठोस धोरण, योग्य नियोजन यामुळे गॅस वा इंधनाच्या तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही. पण आज भाजपा सरकारकडे अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतेही धोरण नाही, संवाद नाही, सरकारने सर्व घटकांशी संवाद साधून त्यातून मार्ग काढला पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, माझ्यावर फडणवीस व भाजपाचे नेते अत्यंत खालच्या पातळीवरची टिका करतात त्याचे आश्चर्य वाटत नाही कारण फडणवीस व भाजपा विचार हा बहुजनांचे हक्क नाकारणारा आहे. हजारो वर्षापासूनचा हा संघर्ष आहे, त्यांची मानसिकता बहुजनविरोधी आहे. याच विचाराचा सामना आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही करावा लागला, मी तर पामर आहे. त्र्यंबकेश्वरच्या भूमीतून मी फडणवीस यांच्यासाठी परमेश्वराकडे सुबुद्धी देवो, अशी प्रार्थना करतो आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या दोन ओळी सांगतो, “छोटे दिल से कोई बडा नही होता, तुटे दिल से कोई खडा नही होता”, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

विधानभवनात बॉम्ब असल्याचा ई मेल आला हे ऐकून राज्यातील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे याचा प्रत्यय येतो. विधान भवन जर सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित करत पोलीस सध्या खलाचे रक्षण करत आहेत,असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

गॅस तुटवड्याविरोधात राज्यभर काँग्रेसचे आंदोलन.
सरकारने अचानक गॅसच्या किमती वाढवल्या व दुसरीकडे युद्धामुळे गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने वाढवलेले गॅस दर तात्काळ रद्द करावे व गॅस सिलेंडर सहजपणे उपलब्ध होतील यासाठी उपाय योजना कराव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे यशवंतराव चव्हाणांचे विचार आजही मार्गदर्शक– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन मुंबई, दि. १२ मार्च...

विक्रीसाठी ठेवलेल्या खाद्यपदार्थांच्या तपासण्या वाढवाव्या :-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : शहरातील हॉटेल्स, स्नॅक्स सेंटर्स आणि खाद्यपदार्थ विक्री...

‘नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब’:संसद परिसरात राहुल-प्रियांकांनी केली निदर्शने

नवी दिल्ली- संसद परिसरात राहुल यांच्यासह विरोधी पक्षाच्या...