मुंबई-समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुंबई महानगरपालिकेतील (BMC) कथित भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पालिकेचे टेंडर कंत्राटदार आणि दलालांच्या संगनमताने तयार केले जात असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रईस शेख यांनी प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या ‘E’ वॉर्ड कार्यालयाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. यासंदर्भातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: ‘E’ वॉर्डची मुख्य इमारत धोकादायक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या कार्यालयाचा कारभार चार वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत सुरू आहे, ज्याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.नवीन इमारत बांधण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून प्रक्रिया सुरू आहे, मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. एका विशिष्ट कंत्राटदाराला हे काम हवे आहे, मात्र काही तांत्रिक किंवा आर्थिक गणिते जुळत नसल्याने हे कामतत रेंगाळले असल्याचा दावा शेख यांनी केला आहे.
महापालिकेत कंत्राटदार-दलालांचे वर्चस्व- आमदार रईस शेख
Date:

