हिंजेवाडी ते शिवाजीनगर कोर्ट —मेट्रो कधी धावणार ??
पुणेकर नागरीकांना खरोखर येत्या ६ महिन्यात तरी ही सेवा मिळणार काय ??असे प्रश्न उपस्थित करत माजी नगरसेवक, भाजपचे ज्येष्ठ नेते विकास मठकरी यांनी सध्याच्या प्रशासनाला साद घालून हलविण्याचा प्रयत्न केला आहे.
ते म्हणतात,मेट्रोचा सर्वांगीण विस्तार एक मोठ्ठ प्रश्र्न चिन्हचं आहे. PMRDA हे या प्रकल्पाचे जबाबदार असले तरी खांद्यावर बंदुक शेवटी TATA वरतीच आहे.
₹ आठ हजार कोटींचा [ २० % राज्य , २० % केंद्र आणि उर्वरित ६० % टाटा ] हा प्रकल्प वेळेत पुर्ण करणे तसं फार मोठं आव्हान होतं यांची जाणीव पुणेकराना आहे. पणं मुदत संपली आहे , आणि ती मुदत आता सरकारला पुन्हा वाढवावी लागणार. पण किती ?? किती वाढवत रहाणार??पुणं हे बेफाम वेगाने चौफेर वाढणारे शहर आहे. त्यामुळे मेट्रोची गरज आणखी , आणखी वाढत जाते. ज्या वेगाने शहर वाढतेय त्या वेगाने सुविधा वाढत नाहीत ही खंत आहे,
मनुष्यबळ घ्या, पैश्यांची व्यवस्था करा , पणं प्रकल्प लवकर पुर्ण करा. आता मेट्रोच्या मार्गांवर सुरक्षित पणे मेट्रो धावली, [ विशेष करून मुलूंड मेट्रो अपघात १ ठार हे लक्षात ठेवून..] ही चांगली गोष्ट आहे, पण तरी बाकी काम ?? २३ मेट्रो स्टेशन उभी करणं ? आणि त दनुषंगिक अक्षरशः असंख्य कामं आहेत , आणि सगळेच पुणेकर रोज रस्त्यावर बघत असतातच ,आणि प्रचंड हाल निमुटमार्गानें सोसत असतांत. म्हणूनच मेट्रो लवकर करा हो अशी साद प्रा. विकास मठकरी यांनी घातली आहे.

