मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणा शिकवू नये अशा शब्दात टिपू सुलतान विषयी भाजपने उठविलेल्या गदारोळावर कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच फडणवीसांनी आम्हाला शहाणपण शिकवण्याच्या भागनडीत पडू नये असा टोलाही हाणला आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते.
ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. संविधानाच्या मूळ प्रतिवर शिवाजी महाराज व टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे, असे ते म्हणालेत.
फडणवीसांनी शहाणपणा शिकवू नये – सपकाळ
Date:

