नागपूर-कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिपू सुलतान यांनाही मान दिला गेला पाहिजे असे वादग्रस्त विधान केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचे जे काम त्यांनी केले आहे ते अतिशय निंदनीय असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केले. मुघलांच्या जोखडातून सामान्य जनतेला मुक्त करण्याचे काम केले. खऱ्या अर्थाने सामान्य रयतेचे राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते. आणि त्याच वेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणे टिपू सुलतान. या दोघांची तुलना करून दोघांना सारखे सन्मान द्या म्हणणे यापेक्षा जास्त लांगूलचालन, जोडे चाटणे मी या जन्मान बघितले नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केळकी त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसेच अशा पद्धतीने ते बोलत असतील आणि कॉंग्रेस पक्षाने जरा जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे.

