मंत्रालयात 6 वर्षे एकाच खुर्चीवरील अधिकाऱ्यांच्या करणार दोन महिन्यांत बदल्या

Date:

मुंबई-मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. मंत्रालयातील विविध विभागांत गेल्या सहा वर्षांपासून एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या सह-सचिवांपासून ते लिपिकांपर्यंतच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आता एप्रिल-मे महिन्यात घाऊक बदल्या होणार आहेत. विशेष म्हणजे, या बदल्या थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारची राजकीय ‘फील्डिंग’ किंवा दबावतंत्र चालणार नसल्याचे स्पष्ट संकेत शासनाने दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वारंवार लक्षात आले होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसारच आता बदल्यांची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे ज्यांना बदली करून घ्यायची आहे, त्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे काह जणांनी याबाबत आनंदही व्यक्त केला आहे.

अपर मुख्य सचिवांचे यादी तयार करण्याचे युद्धपातळीवर आदेश
1 अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी मंत्रालयातील सर्व विभागांना यासंदर्भात तातडीने तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
2 ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एकाच पदावरील कार्यकाळ सहा वर्षे पूर्ण झाला आहे, त्यांची यादी त्वरित तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
3 बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५’ नुसार ही कठोर कारवाई होईल.

सामान्य सेवाकाळ मर्यादा ३ वर्षे

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची एकाच पदावरील सामान्य सेवाकाळाची मर्यादा ३ वर्षे असते. अपवादात्मक परिस्थितीत ही मर्यादा वाढवता येते, मात्र ६ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच जागी राहणे नियमाबाह्य ठरते. नियमानुसार, बदल्यांचे आदेश दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात काढले जातात.

बदल्यांच्या कक्षेत सहसचिव व उपसचिव, अवर सचिव व कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक-टंकलेखक व लघुलेखक अधिकारी कर्मचारी असणार आहेत. अनेकदा बदली झाल्यानंतर संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी आपली बदली रद्द करण्यासाठी राजकीय दबाव आणतात किंवा प्रशासकीय विभागाकडून मुदतवाढीची मागणी करतात. यामुळे बदल्यांच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो आणि प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन, यंदा नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल.

बदली झालेल्या कर्मचाऱ्याला कार्यमुक्त केल्यावर विभागाचे कामकाज ठप्प होऊ नये, यासाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी आतापासूनच तयार करण्याचे आदेश दिले आहेत. बदलीच्या ठिकाणी नवा कर्मचारी रुजू होईल याची खात्री करूनच जुन्या कर्मचाऱ्याला मुक्त करावे, जेणेकरून कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही. प्रशासनात बदल्यांचे वारे वाहू लागल्याने अनेक वर्षांपासून एकाच जागी स्थिरावलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली आहे.

प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मंत्रालयातील ‘लॉबिंग’ला चाप बसणार आहे. दोन महिने आधीच खबरदारी घेऊन पर्यायी व्यवस्था निर्माण करीत आहे. बदली झाल्यानंतर ती रद्द करण्यासाठी किंवा मुदतवाढ मिळवण्यासाठी केली जाणारी रडारड करता येणार नाही, असा संदेश यातून देण्यात आला आहे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून प्रशासकीय शिस्त लावण्याचा प्रशासनाचा मानस दिसून येतो. एकूणच यामुळे प्रशासकीय शिस्त लागणार असल्याचे मंत्रालयातील सूत्र सांगत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी चौथ्या जहाजाचे नौदलाकडे हस्तांतरण

नवी दिल्‍ली- कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई)ने स्वदेशी आरेखन...

जगातील सर्वात मोठी जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा एक एप्रिल 2026 पासून होणार सुरू

देशभरातील जनगणतेत 30 लाखांहून अधिक जनगणना कर्मचारी, पर्यवेक्षक आणि...

वापरून झालेल्या बॅटरी साहित्याचा पुनर्वापर करण्यात शास्त्रज्ञांना यश

नवी दिल्‍ली- वापरानंतर क्षमता संपलेल्या लिथियम-आयन बॅटऱ्यांपासून मिळवलेल्या स्पेंट ग्रॅफाईटच्या...

‘सदर्न कमांड’च्या लष्करी कमांडरांनी पुणे येथे ऐतिहासिक वास्तू आणि प्रगत प्रशिक्षण सुविधेचे केले उद्घाटन

पुणे- भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ...