अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद, उच्चस्तरीय चौकशी करा!:भाजपच्या घोटाळ्याच्या फाइलचा उल्लेख करत संजय राऊतांची राज्यसभेत मागणी

Date:

… आणि 10 दिवसांनी अजित पवारांचा मृत्यू झाला

नवी दिल्ली-संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चा सत्रात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करत या विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारवर जोरदार आरोप केले.

आज मला अजित पवारांची आठवण येत आहे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आम्ही सगळे अजूनही धक्क्यात आहोत, आम्हाला अजूनही कळत नाहीये की हे झाले कसे? अजित पवारांवर 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सरकारने केला होता. पण ते भारतीय जनता पक्षासोबत आले आणि पवित्र झाले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पुढे संजय राऊत म्हणाले, 15 जानेवारी रोजी अजित पवारांनी एक वक्तव्य केले होते आणि भाजपला उद्देशून म्हटले होते की ‘माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करत असाल तर त्यातला पैसा फक्त आम्हीच नाही खाल्ला, भाजपने सुद्धा या घोटाळ्यात पैसा खाल्ला आहे आणि त्यांची फाइल सुद्धा माझ्याकडे आहे’. हे त्यांनी 15 जानेवारी रोजी म्हटले होते आणि 10 दिवसांनी अजित पवारांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. मी आरोप करत नाहीये, पण हा मृत्यू संशयास्पद आहे.

मला जस्टीस लोया यांची सुद्धा आठवण आली

संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे नेहमी ती फाइल सोबत ठेवत होते. ते जेव्हा मुंबईहून निघाले होते, तेव्हा सुद्धा ती फाइल त्यांच्या सोबत होती. त्यानंतर अर्ध्या तासात त्यांचा मृत्यू होतो. याची चौकशी झाली पाहिजे. आता तर मला जस्टीस लोया यांची सुद्धा आठवण आली आहे. अजित पवारांचा मृत्यू पाहिल्यानंतर जस्टीस लोया यांची आठवण आली, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारला आरोप केले.

सोनम वांगचूक कुठे आहे?

संजय राऊत यांनी संसदेत बोलताना सरकारवर देखील जोरदार आरोप केले. हे सरकार बेजबाबदार आहे. लोकशाही या देशात आता राहिलेली नाही. न्यायालय असो किंवा निवडणूक आयोग या सरकारी कंपन्या बनल्या आहेत. सोनम वांगचूक कुठे आहे? त्यांचा अपराध काय आहे? त्यांनी सांगितले होते की आमची जमीन चीनने घेतली, तर त्यांना राष्ट्रद्रोही ठरवत तुरुंगात टाकले. कुठे आहे लोकशाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी ‘मनरेगा’च्या मुद्द्यावरून टीका केली. मनरेगाचे नाव तर बदलले, पण रोजगार कुठून आणणार? शेतकऱ्यांना रोजगार मिळायचा, तो तुम्ही बंद केला. मराठवाड्यात 2025 साली 3 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे सरकार भ्रष्टाचाराने व्यापली आहे. देशभरातील भ्रष्टाचारी एकत्र आणतात आणि सरकार बनवतात, तोडतात. आधी नेत्यांना घडवले जायचे, आज नेत्यांना विकत घेतले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:EpsteinFiles प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

एपस्टीन फाईल्समधील खुलासे भारताच्या परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय हित आणि...

हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यालयात आयटी सेल सज्ज

हवेली (पुणे): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या...