पुणे :पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आयोजित काव्य स्पर्धा
मराठी भाषा संवर्धन समितीच्या उपक्रमा अंतर्गत दिनांक २७ जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज कवींची काव्यस्पर्धा सभागृहात पार पडली.
दरवर्षी पुणे महानगरपालिकेमार्फत मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी १४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ साजरा केला जातो. या पंधरवड्यानिमित्त आयोजित काव्य स्पर्धेत पुणे शहरातील व पुणे शहराबाहेरील मान्यवर कवीनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत प्रथम क्रमांक सर्वश्री कवी संजय जाधव, ( बारामती ) द्वितीय क्रमांक सुजित कदम ( पुणे की व तृतीय क्रमांक संतोष गाढवे ( राजगुरू नगर ) यांनी प्राप्त केला.
विजेत्यांना यावेळी रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भावकवी वि. ग. सातपुते व सौ.कवयित्री वंदना घाणेकर यांनी काम पाहिले.
पुणे महानगरपालिका माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी या काव्य स्पर्धेतील स्पर्धकांचे स्वागत केले. आणि स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली.
श्री गोपाळ कांबळे यांनी या काव्य स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.
या काव्य स्पर्धेमध्ये सर्वश्री खेताराम परीयारिया, रा.वि.शिशुपाल, संतोष गाढवे, रमेश जाधव, सुजित कदम, मिनाक्षी शिलवंत, वृंदा भांबुरे, डॉ.दाक्षायणी पंडीत, ज्योती हमीने, संजय माने,अमोल सुपेकर, विनोद अष्टुळ, आशा यमगर, संजय जाधव इत्यादी कवींनी मानवी संवेदना, प्रेम, निसर्ग, दुःख, विरह व सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या उत्तम कविता सादर केल्या. न्याय,ऊसतोड, कुटुंब पद्धती, झाड, माय मराठी, सांगावा,जगून घे थोडं, प्राण आहे मायभूमी, सखी, कथा, सोळा ऑगस्ट ओरडला, माझी शाळा- माझी मुले माझे हिरो अशा अनेक विषयांवरील कविता यावेळी सादर झाल्या.
परीक्षक मा. वि. ग. सातपुते यांनी काव्य प्रवासातील आपले अनुभव कथन करुन तीन रचना सादर करून वाचन , मनन , चिंतन ,आणि वास्तव लेखन यांनी आत्ममुख होवून कवींनी आपल्या रचना कराव्यात असे विचार व्यक्त केले.
त्यानंतर आभार प्रदर्शनाने काव्य स्पर्धेची सांगता झाली.

