इतिहासात जिन्ना–हिंदू महासभेची युती:भाजप-एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू; दोघांची नैसर्गिक युती महाराष्ट्रासाठी घातक- हर्षवर्धन सपकाळ

Date:

मुंबई-महाराष्ट्रात भाजप आणि एमआयएम हे दोन जातीयवादी विचारांचे पक्ष आहे. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांची दोघांची युती आहे. एमआयएम आणि भाजप हे महाराष्ट्र धर्मासाठी बाधक आहेत, त्यांनी फिक्स करत ही निवडणूक लढवली, यामुळे त्यांच्या दोघांची ताकद वाढलेली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. जिन्ना आणि हिंदू महासभेची युती होती. बंगालमध्ये मुस्लीम लीगचा मुख्यमंत्री, तर जनसंघाचे मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते. ही दोघांची नैसर्गिक युती आहे, जी या निवडणुकीत समोर आली.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता जर वेळीच सावध झाली नाही तर ही लोकं राज्याचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे औवेसी(एमआयएम) आणि देवेंद्र फडणवीस(भाजप) यांची जी मैत्री आहे एकाच विचाराने ते दोघे पुढे वाटचाल करत आहेत, हे आपण ओळखले पाहिजे. हा काय नवीन विषय नाही.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेना गेली अनेक वर्षे मुंबई मनपा एकमेकांच्या विरोधात लढत आहे. मुंबईमध्ये काँग्रेसने वंचितसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.आमच्यावर होणारी टीका ही चुकीची आहे. वंचित आघाडीच्या नेत्यांची भावना आम्ही जाणून घेणार आहोत. वंचितचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पण जय-पराजय नाही तर आमच्यासाठी विचारांचा मेळ आहे. गांधी-आंबेडकर पॅटर्नने आम्हाला पुढे जायचे आहे त्या दृष्टीने आम्ही युती केली.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे पक्षांतर्गत आहे त्यावर कारवाई सुरू आहे. भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्यातील अंतर्गत संघर्षावर लवकरच समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सर्व काँग्रेस नेते एकत्रित काम करत आहोत. या टीम वर्कच्या माध्यमातून आम्ही एकत्र येत पक्ष पुढे नेणार आहोत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: अक्कलकोटला निघालेल्या 5 मित्रांचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना...

गुरू षष्ट्यब्दपूर्तीचा हृद्य सोहळा

संगीत घराण्याचे सौदर्यमूल्य अभ्यासणे, जपणे महत्त्वाचे : पंडित सत्यशील देशपांडे पंडित धनंजय खरवंडीकर, विदुषी कविता खरवंडीकर यांचा षष्ट्यब्दीनिमित्त गौरव सोहळा पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात सर्व घराण्यांची सौंदर्यमूल्ये अभ्यासणे व जपणे महत्त्वाचे आहे. गुरूंच्या सहवासाने जीवन सूरमयी व आनंदी होते. धनंजय व कविता खरवंडीकर यांच्याशी शास्त्रीय संगीताविषयी होणारा संवाद या हृदयीचे त्या हृदयी असे हितगुज ठरते, असे मत ज्येष्ठ गायक व संगीत अभ्यासक पंडित सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ तबलावादक व संगीतकार पंडित धनंजय खरवंडीकर आणि आग्रा घराण्याच्या  गायिका विदुषी कविता खरवंडीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पंडित सत्यशील देशपांडे बोलत होते. ज्येष्ठ तबलावादक पंडित ओंकार गुलवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. कल्परूप संस्थेच्या संचालिका व विदुषी खरवंडीकर यांच्या शिष्या धरित्री जोशी-बापट यांनी  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम एसएनडीटी सभागृहात झाला. पंडित धनंजय खरवंडीकर यांचा सत्कार पंडित ओंकार गुलवडी तर विदुषी कविता खरवंडीकर यांचा सत्कार पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी शिष्यांच्या हस्ते खरवंडीकर दाम्पत्याचे गुरुपूजन झाले. रागसंगीत व बंदिशींविषयी आजच्या काळात आस्था कमी प्रमाणात जाणवते असे निरीक्षण नोंदवून पंडित सत्यशील देशपांडे म्हणाले, अशा काळात कविता खरवंडीकर यांना बंदिशींमधील मर्म जाणून घेण्याची ओढ आहे आणि या विषयी त्या सखोल चिंतनही करीत आहेत. धनंजय यांचे वादन उपज अंगाचे असून तालाचे व गायनाचे सौंदर्य वाढविणारे असते. पंडित ओंकार गुलवडी म्हणाले, गुरू व शिष्याचे नाते जन्मोजन्मीचे असते. गुरूचे प्रेम व आशीर्वाद मिळणे हे शिष्यासाठी उर्जादायी असते. कला क्षेत्रात धनंजय व कविता यांचे योगदान मोठे आहे. धनंजय यांच्या तबला वादनातील रचना या पारंपरिक असल्या तरी त्यात नाविन्यपूर्णता जाणवते. सत्काराविषयी बोलताना पंडित धनंयज खरवंडीकर म्हणाले, गुरूंचे कौतुकाचे शब्द आमच्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहेत. गुरूंचे आशीर्वाद व मार्गदर्शनानेच आम्ही घडत गेलो. आमच्या हातून या क्षेत्रात अजूनही भरीव कार्य घडावे अशी इच्छा आहे. कविता खरवंडीकर म्हणल्या, गुरूंनी भरभरून दिलेल्या ज्ञानाविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. गुरू हा शिष्याला घडवत असताना स्वत:ही घडत असतो कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी कविता खरवंडीकर यांची गायन मैफल रंगली. मैफलीची सुरुवात राग केदारमधील ‘बहुत गई, थोडी रही’ या बडा ख्यालने केली. त्यानंतर मध्यलय तीन तालातील ‘कंगनवा मोरा अत ही अमोला’ ही रचना सादर करून द्रुत एकतालातील ‘ए नवेली नार’ ही रचना ऐकविली. त्यानंतर राग नट बिहागमधील ‘कैसे कैसे बोलत मोसे लोगवा’ या रचनेला जोडून द्रुत तीन तालातील ‘झन झन झन पायल बाजे’ ही रचना प्रभावीपणे सादर केली. मैफलीची सांगता मिश्र तिलंगमधील ‘सावरिया तोपे वारी’ या ठुमरीने केली. मधुर आवाज, शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि भावपूर्ण सादरीकरणातून ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. पंडित धनंजय खरवंडीकर (तबला), पंडित उदय कुलकर्णी (संवादिनी), धरित्री जोशी-बापट, श्रुती खरवंडीकर (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली. प्रास्ताविकात  धरित्री जोशी बापट यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन आरती पटवर्धन यांनी केले तर आभार अनघा देशपांडे यांनी मानले. कलाकारांचा सत्कार दिप्ती जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

पहिला वन जैवविविधता महोत्सव पणजीत उत्साहात सुरू

‘गोवा बियॉन्ड बीचेस’ संकल्पनेतून जंगले, वन्यजीव व पारंपरिक ज्ञानाचा...