Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

यंत्रणांनी समन्वयातून आळंदी यात्रा यशस्वी करावी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Date:

पुणे, दि. २३: आरोग्य, नगरपालिका, पंचायत समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता, आपत्तीव्यवस्थापन, महावितरण, पोलीस आदी सर्वच विभागांनी योग्य समन्वय ठेऊन आळंदी यात्रा उत्साहात पार पडेल याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

कार्तिकी एकादशी निमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, योगी निरंजननाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी, वारकरी संप्रदायचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, दरवर्षी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व विभागांतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक हा सोहळा यशस्वी करावा. यात्रेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आवश्यक तो औषधांचा साठा, ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवावा. १०२ सेवेच्या आणि १०८ सेवेच्या रुग्णवाहिका सुसज्ज ठेवाव्यात. स्रोतांच्या ठिकाणी तसेच टँकरच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी करावी तसेच निर्जंतुकीकरण करावे. खासगी रुग्णालयातील खाटाही आरक्षित करुन ठेवाव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये आणि स्वच्छतेचे योग्य नियोजन करावे. गर्दीच्या जवळ, दिंड्यांलगत फिरती शौचालये ठेऊन त्याठिकाणी पाणी, विजेची व्यवस्था तसेच मनुष्यबळाची नेमणूक करावी. महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने वीज पुरवठा आणि वीज यंत्रणा सुरळीत राहील तसेच कोणतीही दुर्घटना होणार नाही याबाबत सर्व त्या उपाययोजना कराव्यात. दिंड्यांना गॅसचा पुरवठा तसेच केरोसीन पुरवठ्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नियमित धुरळणी करावी.

पोलीस विभागाने गर्दी नियंत्रण तसेच अनुचित दुर्घटना घडू नये याठी उपाययोजना कराव्यात. वाहतूक सुरळीत सुरू रहावी यासाठी वाहतूक वळविण्याबाबतचे आदेश त्वरीत निर्गमीत करावेत. पीएमपीएमएल व एसटीने पुरेशा प्रमाणात बसेसची व्यवस्था ठेवावी. नदीमध्ये स्नान करणारे भाविक पाहता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने पथके तसेच आवश्यक संख्येने बोटी तैनात ठेवाव्यात. आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपली अग्नीशमन वाहने सतर्क ठेवावीत, आदी सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

नदीमध्ये सध्या असलेले अस्वच्छ पाणी वाहून जावे यासाठी यात्रेस प्रारंभ होण्यापूर्वी तीन दिवस अगोदरपासून वडिवळे धरणाचे पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असेही डॉ. देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

उपविभागीय अधिकारी श्री. कट्यारे यांनी यात्रेच्या अनुषंगाने केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि पंचायत समितीच्या सहायक गट विकास अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने माहिती सादर केली. गतवर्षीपेक्षा अधिक संख्येने एकूण ४०० फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या यात्रेसाठी येणारी भाविक संख्या मोठ्या प्रमाणात लगतच्या ग्रामीण भागात मुक्काम करत असल्याने त्या ठिकाणी देखील पाणी, स्वच्छता, वीज आदींबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

बैठकीस पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्नीशमन दल, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आदी यंत्रणांचे अधिकारी यांच्यासह वारकरी महामंडळचे उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त-सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका

मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या...

सरकारने विमान प्रवासाचे भाडे केले निश्चित

५०० किमी पर्यंत ७,५०० रुपये /५००-१००० किमीसाठी कमाल भाडे...

मुंबई विमानतळावर तुफान राडा..प्रवाशांचा सयंम सुटला

घराची चावी, पासपोर्ट बॅगेत… आता आम्ही काय करायचे?:बॅगा गहाळ...