Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या कोणत्याही पुस्तकात ‘वंदे मातरम’चा उल्लेख असल्यास तो दाखवून द्या-ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले खुले आव्हान

Date:

ज्यांनी तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत, अरविंद सावंतांचा हल्लाबोल
नवी दिल्ली– आज ‘वंदे मातरम’चे गोडवे गाणाऱ्यांच्या ‘पितृ संघटने’ने 50 वर्षे आपल्या कार्यालयावर कधीही तिरंगा फडकवला नाही किंवा राष्ट्रगीत गायले नाही. ज्यांना इतिहासाचा विसर पडला आहे, त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या कोणत्याही पुस्तकात ‘वंदे मातरम’चा उल्लेख असल्यास तो दाखवून द्यावा, असे खुले आव्हान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले आहे. संसदेत ‘वंदे मातरम’वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला.

स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा समाचार घेताना अरविंद सावंत यांनी देशातील संस्थांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पंतप्रधान आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारत असले, तरी आज देशातील न्यायव्यवस्था, सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग यांसारखी कोणतीही संस्था खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ राहिलेली नाही. त्यांच्यात ‘आत्मभान’ उरलेले नाही. संविधानाच्या मूळ ढाच्यावर आणि स्वातंत्र्यावर रोज हल्ले होत आहेत. त्यामुळे ‘वंदे मातरम’चा खरा जयघोष करण्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी देशाला आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत सावंत यांनी सीमावासियांच्या वेदना मांडल्या. एकीकडे मातृभूमीची स्तुती केली जात आहे, तर दुसरीकडे बेळगाव-कारवार-निपाणी भागात मागील 60 वर्षांपासून न्यायासाठी लढणाऱ्या मराठी भाषिकांना अटक केली जात आहे. हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल त्यांनी केला. केवळ कार्यालयांची नावे बदलून विकास होत नसतो, ‘सेवा मंदिरा’चे दरवाजे जनतेसाठी बंद झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

‘वंदे मातरम’चा खरा इतिहास सांगताना अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील बलिदानाची आठवण करून दिली. ते म्हणाले, 1942 च्या आंदोलनात नंदुरबार येथील अवघ्या 14 वर्षांच्या शिरीष कुमारने हातात तिरंगा घेऊन ‘वंदे मातरम’चा नारा दिला आणि तो इंग्रजांच्या गोळीला हसत हसत सामोरा गेला. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात सर्व नेत्यांना अटक झाली असताना, अरुणा असफ अली यांनी धाडसाने तिरंगा फडकवत ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’चा नारा दिला होता. हा देशाचा खरा इतिहास आहे, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कामगार आणि कष्टकरी...

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याची परंपरा

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याचा...

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून २००+ इच्छुकांनी दिवसभरात नेले उमेदवारीसाठी अर्ज

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज वाटप – पहिल्याच दिवशी मोठा...