डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या कोणत्याही पुस्तकात ‘वंदे मातरम’चा उल्लेख असल्यास तो दाखवून द्या-ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले खुले आव्हान

Date:

ज्यांनी तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत, अरविंद सावंतांचा हल्लाबोल
नवी दिल्ली– आज ‘वंदे मातरम’चे गोडवे गाणाऱ्यांच्या ‘पितृ संघटने’ने 50 वर्षे आपल्या कार्यालयावर कधीही तिरंगा फडकवला नाही किंवा राष्ट्रगीत गायले नाही. ज्यांना इतिहासाचा विसर पडला आहे, त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या कोणत्याही पुस्तकात ‘वंदे मातरम’चा उल्लेख असल्यास तो दाखवून द्यावा, असे खुले आव्हान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले आहे. संसदेत ‘वंदे मातरम’वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला.

स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा समाचार घेताना अरविंद सावंत यांनी देशातील संस्थांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पंतप्रधान आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारत असले, तरी आज देशातील न्यायव्यवस्था, सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग यांसारखी कोणतीही संस्था खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ राहिलेली नाही. त्यांच्यात ‘आत्मभान’ उरलेले नाही. संविधानाच्या मूळ ढाच्यावर आणि स्वातंत्र्यावर रोज हल्ले होत आहेत. त्यामुळे ‘वंदे मातरम’चा खरा जयघोष करण्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी देशाला आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत सावंत यांनी सीमावासियांच्या वेदना मांडल्या. एकीकडे मातृभूमीची स्तुती केली जात आहे, तर दुसरीकडे बेळगाव-कारवार-निपाणी भागात मागील 60 वर्षांपासून न्यायासाठी लढणाऱ्या मराठी भाषिकांना अटक केली जात आहे. हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल त्यांनी केला. केवळ कार्यालयांची नावे बदलून विकास होत नसतो, ‘सेवा मंदिरा’चे दरवाजे जनतेसाठी बंद झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

‘वंदे मातरम’चा खरा इतिहास सांगताना अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील बलिदानाची आठवण करून दिली. ते म्हणाले, 1942 च्या आंदोलनात नंदुरबार येथील अवघ्या 14 वर्षांच्या शिरीष कुमारने हातात तिरंगा घेऊन ‘वंदे मातरम’चा नारा दिला आणि तो इंग्रजांच्या गोळीला हसत हसत सामोरा गेला. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात सर्व नेत्यांना अटक झाली असताना, अरुणा असफ अली यांनी धाडसाने तिरंगा फडकवत ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’चा नारा दिला होता. हा देशाचा खरा इतिहास आहे, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबीयांच्या डोक्यावर मायेचा हात…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली स्वर्गीय विदीप जाधव...

बेकायदेशीर रसायनांचा वापर केल्यामुळे  ‘कॉम्फर्ट’ अगरबत्तीवर बंदी

Mumbai February 02, 2026: भारतामध्ये घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित वापरास प्रोत्साहन देणाऱ्या ना-नफा तत्वावरील उद्योग मंडळ होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) तर्फे बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्ती ‘कॉम्फर्ट’ विरोधात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. ‘कॉम्फर्ट’ ही डास प्रतिबंधक अगरबत्ती महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे विक्रीस उपलब्ध असून ती मेसर्स धूप छांव कंपनी यांचे उत्पादन आहे. खुल्या बाजारातून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांवरून हे उत्पादन अनभिज्ञ ग्राहकांकडून खरेदी केले जात असल्याचे स्पष्ट झाले असून, महाराष्ट्र कृषी विभागाने केलेल्या प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये ‘कॉम्फर्ट’ मध्ये बेकायदेशीर आणि मान्यता नसलेले रसायन डाइमफ्लुथ्रिन आढळून आले आहे. ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक तसेच उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीस असल्याचे सांगितले जाते. मुंबईमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना डाइमफ्लुथ्रिन असलेल्या ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्यांचे अनेक बॉक्स आढळून आले. धूप छांव कंपनी कडे परवाना तसेच CIBRC मान्यता या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे, कीटकनाशके अधिनियम, 1968 आणि कीटकनाशके नियम, 1971 अंतर्गत या उत्पादनाचे उत्पादन व विक्री बेकायदेशीर ठरते. हर्बल असल्याचा खोटा दावा करत अनेक बेकायदेशीर अगरबत्त्या विक्रीस आणल्या जात असून, त्यामध्ये बेकायदेशीर आणि शासनमान्य नसलेली रसायने वापरली जात आहेत. ‘कॉम्फर्ट’, ‘स्लीपवेल’ आणि ‘रिलॅक्स’ या नावांनी विक्री होणारी उत्पादने यामध्ये ओळखली गेली आहेत. यामुळे भारतभर मान्यता नसलेली कीटकनाशके असलेल्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्यांविरोधात अंमलबजावणी कारवाईत वाढ झाली असून, नियामक सतर्कता आणि सार्वजनिक आरोग्याबाबतची चिंता अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येते. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIBRC) ही वैधानिक संस्था असून, भारतात डास प्रतिबंधकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांना उत्पादन, आयात किंवा विक्रीपूर्वी मंजुरी व नोंदणी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शासनमान्य CIBRC-मान्यताप्राप्त डास प्रतिबंधक उत्पादनांवर नोंदणी क्रमांक (CIR –...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच पक्षाध्यक्ष हव्यात,चित्रपट व सांस्कृतिक विभागाची आग्रही मागणी

पुणे-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच पक्षाध्यक्ष हव्यात अशी आग्रही मागणी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिली नेतृत्वाची संधी

महिलांसाठी महापौरपद आरक्षित नसताना ‘लाडक्या बहिणीं’कडे जबाबदारी; हा शिवसेनेचा...