प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
रशिया सोबत संबंधाची पायाभरणी काँग्रेस काळात..!
मुंबई -१९७१ च्या युद्धात अमेरिकेने जेंव्हा बंगालच्या उपसागरात विमानवाहू जहाज पाठवून पाकिस्तान’ला पाठिंबा दिला होता,
त्यावेळी २ दशकात झालेली पं नेहरूं, शास्त्रीं व इंदीरा गांधी’च्या नेतृत्वाखालील भारताची प्रगती, सामर्थ्यपुर्ण अस्तित्व, स्वयंसिद्धता व परराष्ट्र नितीची दखल घेऊनच, रशिया’ने भारतास मदत देऊ केली, हे वास्तव आहे.
तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदीरा गांधीची परराष्ट्र निती व मुत्सद्देगिरी मुळे ऑगस्ट १९७१ मध्ये भारताचा “शांतता, मैत्री आणि सहकार्याचा भारत-सोव्हिएत करार” होऊ शकला हे ईतिहास साक्ष आहे.
रशिया सोबत उभारलेले गतकाळातील, काँग्रेस कालीन मैत्री संबंध वेळोवेळी भारतास उपयुक्त ठरले.
चीनच्या धमक्यांना न घाबरतां रशिया ने भारतास पाठिंबा दिला व सदैव मैत्री जपली. ज्या मैत्री’ची पायाभरणी ही काँग्रेस सत्ताकाळ्त झाल्याचे सांगण्यास काँग्रेसजनांना अभिमान वाटत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
सोव्हिएत नौदलाने अमेरिकेच्या सातव्या ताफ्याला तोंड देण्यासाठी हिंद महासागरात युद्धनौका तैनात केल्या, जो भारतासोबत सोव्हिएत युतीचा एक प्रमुख पथदर्शक होता.
मात्र अमेरिका धार्जिण भुमिका घेणारे भाजपचे शिर्ष नेतृत्व
रशिया सोबतची साथ संगत सोडण्याच्या भुमिकेत होती हे वास्तव देखील भाजप’ला मान्य करावे लागेल.
केवळ स्वतःच्याच नेतृत्वाची पाठराखण करण्यात मग्न असणारे व धन्यता मानणारे भाषणजीवी पंतप्रधान मा मोदी’जी हे रशिया दौऱ्यावर असतांना “२०१४ पुर्वी भारत निराशा व हतबलतेच्या खाईत होता” अशी देशाची बदनामी करणारी व अहंकारी वक्तव्ये करतात तेंव्हा भारतीय नागरिक म्हणून मनास वेदना होतात.
गेल्या ६५ वर्षात काँग्रेस’ची केंद्रात सरकारे असतांना संसदीय लोकशाही संकेत व परंपरेचे पालन करीत वेळोवेळी प्रोटोकॉल प्रमाणे लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेत्यास (ज्याला इंग्रजी परंपरेत Shadow PM) संबोधले जाते, त्यांना राष्ट्रपती द्वारा स्वागतपर भेटीच्या कार्यक्रमाला नेहमीच बोलावले जात होते.
तत्कालीन विरोधी पक्षनेते मा अटलजी बाजपेयी, अरुण जेटली, सुषमा स्वराज हे नेते उपस्थित देखील राहिले होते, मात्र मोदी – शहांच्या काँग्रेस प्रती असुयेपोटी व अहंकारी वृत्तीने या प्रथांना पायदळी तुडवले जात असल्याची बाब संविधानीक व लोकशाही परंपरांचे हनन करणारी असल्याचे काँग्रेस वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

