पुणे:
राज्यातील कोणत्याही जागां वरील निवडणुका स्थगित करावयाच्या आहेत वा कसे व कोणत्या कारणासाठी(?)याचे स्पष्टीकरण *राज्य निवडणूक आयोगाने.. ‘पत्रकार परिषद’ घेऊनच,निर्णय जाहीर करावा… मोघम सर्क्युलर काढून करू नये अशी मागणी काँग्रेस ने केली आहेअन्यथा होणाऱ्या गोंधळास व लोकशाही’च्या हत्येस,
निवडणूक आयोग जबाबदार राहील असा सक्त इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी रविवार दि ३० नोव्हें रोजी ऊशीरा दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे.
ते पुढे म्हणाले की, आमचे माहीती नुसार
राज्यातील काही नगर परीषदा व नगराध्यक्ष पदाच्याच निवडणुका स्थगित वा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात असून.. निवडणूक आयोगाचा २९ नोव्हेंबर चा निर्णय आज ३० नोव्हें रोजी देखील स्पष्टपणे जाहीर होत नसुन,
“राज्य निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांचे दबावाखाली” काम करत असून,
सत्ताधाऱ्यांचे हातचे बाहुले बनत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

