TV मालिका:कलाकारांची शारीरिक,मानसिक,आर्थिक पिळवणूक करण्यात आघाडीवर असल्याचे मानले जाते स्ट्रगलर युवा पिढीला इथे खूप काही सोसावे लागते. , बड्या प्रस्थापित कलाकारांची यातून सुटका झालेली असते पण तरीही चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी आता त्यांच्या अभिनयासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.ज्यामुळे या विषयाच्या चर्चेला आता पुन्हा सूर लाभू लागला आहे.
रोहिणी हट्टंगडी आता टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करणार नाहीत, याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नलशी साधलेल्या संवादात रोहिणी हट्टंगडी यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम न करण्याच्या निर्णयाबद्दल मोठा खुलासा केला.
मालिका न करण्यामागचं कारण काय?
त्या म्हणाल्या, “मी तरुण असताना जिम्स क्वचितच अस्तित्वात होत्या. आमचं काम हा एक प्रकारे व्यायाम असायचा, पण टेलिव्हिजनसाठी खूप मेहनत आणि वेळ द्यावा लागतो. सकाळी लवकर बाहेर पडायचं, रात्री उशिरापर्यंत शूटिंग करायचं, रात्री ११ वाजता घरी परत यायचं आणि दुसऱ्या शिफ्टसाठी पुन्हा सकाळी ६ वाजता उठावं लागायचं. माझ्या लक्षात आलं की मला व्यायाम करायला, आराम करायला किंवा श्वास घेण्यासाठीही वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मी कामाचा वेग कमी केला आणि म्हणूनच मी टीव्ही मालिकांमध्ये काम करणे थांबवले.”या संदर्भात बोलताना त्यांनी मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील निराशाही व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खूपच गोंधळ झाला आहे. अनेकदा, काम करण्यास उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे सांगितल्यानंतरही कलाकारांना शेवटच्या क्षणी फोन येतात. जर त्यांनी अचानक एखादा सीन शूटिंगसाठी बसवला, तर त्वरित सेटवर येण्यासाठी कलाकारावर दबाव आणला जातो. यामुळे मला खूप त्रास झाला. त्यामुळेच मी ठरवले की, मी यापुढे अशा पद्धतीने काम करू शकत नाही.”
अशाप्रकारे रोहिणी हट्टंगडींनी यापुढे मालिकेत काम का करणार नाही, याबद्दल खुलासा केला. रोहिणी हट्टंगडींनी जी कारणं दिली त्यामुळे सर्वांनी त्यांच्या निर्णयाचा आदर केला. याशिवाय मराठी मालिकांमधील अनियोजित कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहिणी यांची काहीच महिन्यांपूर्वी पूर्णा आजीच्या भूमिकेत ‘ठरलं तर मग’ मालिकेत एन्ट्री झाली होती.

