पुणे : ओबीसी सेवा संघ ,ओबीसी राजकीय आघाडी व माळी विकास मिशन म.राज्य मा.सुनील खोब्रागडे आणि प्रा.श्रावण देवरे यांचे ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष ,जाती अंताचे क्रांतिकारी पर्व खंड 1 चे प्रकाशन समता भूमी येथे थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या 135 व्या स्मृतिदिनानिमित दि.28 नोव्हेंबर २०२५ रोजी (समतादिनी) दु.1 वाजता ओबीसी तरुण योद्धे प्रा.लक्ष्मण हाके यांचे व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी समता भूमीवरील सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांच्या व स्री शिक्षणाचे आध्यप्रनेत्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास कार्यक्रमाचे सुरुवातीला पुष्पहार आर्पण करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माळी मिशनचे कार्यकर्ते संजयबाबा करपे ,डॉ.बी.के.यादव , समता परिषद चे आबा भोंगळे ,लहू अनारसे,मंगेश गोरे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.लक्ष्मण हाके यांनी प्रतिपादन केले की माननीय सुनील खोब्रागडे आणि प्रा.श्रावण देवरे यांनी एकत्र येऊन “ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष ,जाती अंताचे क्रांतिकारी पर्व खंड 1 या नावाचा महाग्रंथ साकार केला त्यामध्ये भाग 1 प्रा.देवरे यांनी डॉ.आंबेडकरानी ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्यांना का नाकारले व भाग 3 संविधानाचा व न्यायालायाचा अवमान टाळण्यासाठी जात बदलून देणारा जी.आर.रद्द झालाच पाहिजे आणि भाग 2 कुणबी मराठा जातीच्या संबधाचा इतिहास प्रा.सुनील खोब्रागडे यांनी विस्तृत माहितीपूर्ण लिखाण केले असून ह्या ग्रंथ निर्मितीचे मुख्य कारण म्हणजे 2 सप्टेंबरचा काळा जी.आर.होय. दुसरे असे की देवरे सरांनी आपली तब्बेत बरी नसताना देखील आजच्या समतादिनी ओबीसी बांधवाना एकजुटीत आणणारा हा महाग्रंथ माझे हस्ते प्रकाशित केला आहे हे मी माझे भाग्य समजतो.देवरे सरांनी ओबीसी समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून ओबीसी मंडल आयोगापासून आज पर्यंत अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित केले असून त्या ग्रंथाचे आधारावरच आम्ही आमच्या ओबीसी आरक्षणाच्या लढया लढत आहोत असे म्हणत सर्व बांधवानी आपल्या संग्रही हा ग्रंथ आवर्जून ठेवावे असे देखील आवाहन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविकमध्ये रघुनाथ ढोक यांनी माहिती देताना सांगितले की हा महाग्रंथ लेखक व प्रकाशकांनी ओबीसी तरुण योद्धे प्रा.लक्ष्मण हाके ,नवनाथ वाघमारे ,मंगेश ससाणे,भरत निचिते ,रविंद्र टोंगे,रामभाऊ पेरकर,प्रा.विठ्ठल तळेकर आणि प्रल्हाद कीर्तने या लढवय्यांना व त्यांच्या साथीदारांना सविनय अपर्ण केला असून हा ग्रंथ लेखक देवरे सरांनी आजारी असताना देखील प्रथमावृत्ती 28 नोव्हेंबर 25 म्हणून त्याच दिवशी प्रकाशितचा आग्रह धरला आणि तो ग्रंथ देखील प्रा. लक्ष्मण हाके यांचे हस्ते प्रकाशित झाला हे देखील तेवढेच महत्वाचे आहे असे म्हंटले.कार्यक्रमाचे आयोजन प्रकाशक अमृतराव काळोखे ,माळी विकास मिशन आणि सूत्रसंचालन व आभार संजय करपे यांनी मानले.

