आरोपींची घरे पाडणे ही राज्य सरकारची बेकायदा कृत्ये चिंताजनक:माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई

Date:

राज्य सरकार ची अशी अतिरेकी कृत्ये मूलभूत हक्कांचेही उल्लंघन: अशा प्रकरणात अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ शकते

मुंबई : भारताचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी विविध राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांनी केवळ गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींची घरे पाडण्यासाठी बुलडोझर कारवाई केल्याबद्दल कठोर शब्दांत टीका केली आहे.त्यांनी अधिकाऱ्यांचा हा न्यायालयासारखे वागण्याचा प्रकार चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.एएनआयशी बोलताना न्यायमूर्ती बी. आर. गवई म्हणाले की, ही पद्धत म्हणजे राज्य सरकार स्वतःहून दोषी कोण हे ठरवते आणि कोणतेही चुकीचे काम न केलेल्या कुटुंबियांना शिक्षा देते.

“जेव्हा एखादा नागरिक गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याचे आढळून येते, तेव्हा त्यात त्याच्या कुटुंबियांचा काय गुन्हा असतो? त्यांचे घर का पाडायचे? अधिकारी न्यायाधीश म्हणून काम करू शकत नाहीत”, असे ते म्हणाले.सर्वोच्च न्यायालयाची बुलडोझर प्रकरणातील हस्तक्षेपाची आठवण करून देताना ते म्हणाले की, “अधिकारी अतिरेक करत आहेत. सूचना किंवा कायदेशीर प्रक्रियेशिवाय घरे पाडत आहेत हे आढळल्यानंतरच न्यायालयाने हस्तक्षेप केला. अशा कृती केवळ आरोपींच्या हक्कांचेच उल्लंघन करत नाहीत, तर त्याचे आई-वडील, भावंडे, मुले आणि इतर सर्व निष्पापांच्या मूलभूत हक्कांचेही उल्लंघन करतात. हा प्रकार कायदा स्वतःच्या हातात घेण्याशिवाय दुसरे काहीही नाही.”

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी पुढे नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना बुलडोझरने घरे पाडण्याचा बेकायदेशीर प्रकरणांमध्ये त्वरित उच्च न्यायालयांमध्ये जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. न्यायालयाने कडक सुरक्षा उपाय देखील आखून दिले आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन केले आहे त्यांना अवमान केल्याबद्दल शिक्षा होऊ शकते असे निर्देश दिले आहेत

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...