वन्यजीव कायद्यात सुधारणा करण्याची माने यांची मागणी पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगीळ यांच्याशी चर्चा करावी

Date:

पुणे : जुन्या झालेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणा करून मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
त्यासाठी सरकारने ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगीळ यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी ई –मेल द्वारे पाठवले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मानवाचा पर्यावरणामध्ये अमर्यादित हस्तक्षेप सुरु झाला आहे. मानवाने बेसुमार जंगलतोड केली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जंगलतोड झाल्यामुळे रानडुक्कर, बिबट्या, हत्ती या सारखे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. मानवी वस्तीत येऊन बिबट्या माणसांवर तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे. त्यामुळे सध्या प्रचलित असणाऱ्या वन्यजीव कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्याशी चर्चा करावी. मी नुकतच त्यांच्याशी चर्चा केली, या चर्चेनुसार त्यांच्याकडे याबाबत अनेक उपाययोजना आहेत. वन्यजीव, रानडुकरे, बिबट्या यांपासून निर्माण झालेल्या प्रश्नासह, या कायद्यात काळानुरूप बदल करण्याचे त्यांचे मत आहे. आपण त्याबाबत सक्षम अधिकारी पाठवून त्यांच्याकडील माहितीनुसार कायद्यात काय बदल करवा याबाबत त्यांचा सल्ला घेऊन त्यावर लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती माने यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 50% वरून 18% पर्यंत कमी केला;रशियाकडून तेल खरेदी करणार नाही,व्हेनेझुएलाकडून घेईल-भारताकडून ग्वाही

भारत आणि अमेरिकेदरम्यान ज्या व्यापार कराराची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती,...

भोसरी व पिंपरी विभागातील वीज पुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन पुणे, दि. २ फेब्रुवारी,२०२६ : महापारेषण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:EpsteinFiles प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

एपस्टीन फाईल्समधील खुलासे भारताच्या परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय हित आणि...