57 इमारती मधील 803 नागरिक जीव मुठीत घेऊन रहात आहेत.
पुणे- शेकडो पोस्ट कार्ड पाठवून मुख्यमंत्र्यांना पुण्यातील लोकमान्यनगर पुनर्विकासावरील स्थिगिती उठवण्याची विनंती आज येथील रहिवाश्यांनी केली. लोकांनी निवडून दिलेल्या आमदाराच्या दोन वाक्यावर स्थगिती दिली आणि आता लोक गेल्या ऑगस्ट पासून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने करतोय , ओरड ओरड ओरडतात … मग स्थगिती का नाही उठवत ? असा सवाल या निमित्ताने या रहिवाश्यांनी केला आहे.
ते म्हणाले,’ पुण्यातील लोकमान्य नगर येथील 57 इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग स्थानिक आमदार हेमंत रासनेंच्या एका पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती देऊन रोखला. त्यामुळे हजारो नागरिकांच्या घराचे स्वप्न भंग झाले. ही स्थिगिती उठवण्यासाठी पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समिती स्थापन झाली. ऑगस्ट पासून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना व म्हाडाच्या उपाध्यक्षांना निवेदन दिले, हेमंत रासनेंच्या कार्यालयावर शेकडोंनी मोर्चा नेऊन त्यांना जाब विचारला, म्हाडाच्या कार्यालयाला घेराव घातला, सह्यांची मोहीम राबवली या सारख्या लोकशाही मार्गाचा त्यांनी वापर केला.शेकडो नागरिकांनी पंतरप्रधान मोदी साहेबांना इमेल पाठवला .
वास्तविक पाहता 57 इमारती मधील 803 नागरिक जीव मुठीत घेऊन रहात आहेत. लोड बेअरिंग पद्धतीने बांधलेल्या या इमारती 60 वर्षांपेक्षा जुन्या झाल्यात. या सर्वांना धोकादायक इमारती म्हणून इंजिनियरांनी प्रमाणपत्र दिलीत. राज्य शासनाच्या 79 ए नुसार दोन तीन चार इमारती (सोसायटी ) एकत्र येऊन विकासक नेमलेत. आता बिल्डिंग पाडायच्या व नवीन बांधकाम सुरू करायच्या बेतात असताना रासणेंनी एकूण 16 एकरचा हा भूखंड डोळ्यासमोर ठेऊन एका बिल्डरच्या सहाय्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन स्थगिती मिळवली. रासने यांचा लोकमान्य नगरशी काहीही संबंध नसताना ही स्थगिती मिळवली त्यावर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
चार दिवसांपूर्वी समितीच्या सदस्यांनी प्रवीण दरेकर (अध्यक्ष, पुनर्विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य) यांची मुंबईला त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल साहेबांची भेट करून दिली. समितीच्या सदस्यांनी संपूर्ण लोकमान्य नगरचा लेआऊट त्यांना दाखवून स्थिगिती उठवण्याची विनंती केली. जयस्वाल साहेबांनी सहा इमारतींचा एक मिनी क्लस्टर करण्याचे सुचवले. परंतु येथील सोसायट्या खूप पुढे गेल्यात व काही ठिकाणी ते अश्यक्य असल्याचे त्यांना सप्रमाण दाखवून दिले. त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला.
आज जवळपास 525 नागरिकांनी पोस्ट कार्डाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना स्थगिती उठवण्याची विनंती केली. लोकमान्य नगर येथे नागरिक जमले आणि त्यांनी ही पोस्ट कार्ड मंत्र्यालयात मुख्यमंत्री यांना पाठवली.समितीने आतापर्यंत लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून स्थगिती उठवण्याची मागणी केली. आता वेळ प्रसंगी कोर्टाचा मार्ग अवलंबण्यात येईल असे कळते.

