सलग सात वेळा महापालिका निवडणूक निवडून आलेले,म्हणजे ३५ वर्षे कॉंग्रेसचे नगरसेवक अशी ज्यांची कारकीर्द ते आज कॉंग्रेस पक्षात नाहीत.अन कोणत्याच पक्षात नाहीत.आपल्या वार्डात चांगली उद्याने,चांगली अत्याधुनिक शाळा आणि दर वर्षी काशीयात्रा काढणारे म्हणजे ३५ वर्षातील कारकिर्दीत ज्यांनी ३० वर्षे सुमारे ४० हजार नागरिकांना काशी यात्रा मोफत घडविली.सारी हयात ज्यांनी नवनवीन योजना वार्डात आणण्यासाठी कल्पकता लाऊन काम केले.राज्यभरात मोफत यात्रांचे जे जनक ठरले,कलमाडी वगळता कॉंग्रेसच्या एकही नेत्याने केला नाही असा दर वर्षी नवरात्रौत्सव साजरा करून ज्यांनी कला संस्कृती आणि उत्सव परंपरेला एक चांगले रूप दिले.ते आबा बागुल…विधानसभा निवडणुकीत अवघे १० हजार मते घेऊन पडावेत ?…पक्ष गेला,पद गेले,सारे काही गेले पण अजूनही संघर्ष सुरु आहे या वादळाचा..
कॉंग्रेस पक्षाने त्यांना ३५ वर्षाच्या कारकिर्दीत सत्ता असताना नगरसेवकांनाच देतात अशा पदांपैकी स्थायी समिती अध्यक्ष पद आणि अर्धसत्ता असताना म्हणजे आघाडी असताना उपमहापौर पद दिले, आणि सत्ता नसताना गटनेते पद दिले. एवढ्या वर्षे नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आमदार व्हावेसे वाटणार नाही काय ? आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात निव्वळ कॉंग्रेसच्याच नव्हे तर अन्य पक्षांच्या बड्या बड्या नेत्यांनीही आबा बागुलांचे भरभरून कौतुक करून आबा ने आता आमदार व्हायलाच हवे अशी हवाही भरलेली.चौथीत पास झालेल्या विद्यार्थ्याने हायस्कूल प्रवेश घेण्याचा अट्टाहास का धरु नये काय ?असाच अशा स्वरूपाचा इथे प्रश्न होता…अडचण होती शरद पवारांची म्हणजे आघाडीतील घातक आणि घटक पक्षांची…राजीव गांधींची सर्वात मोठी चूक कुठे झाली असेल तर ती औरंगाबादच्या सभेत त्यांनी शरद पवारांना सोबत घेतले. राष्ट्रवादीशी आघाडी कॉंग्रेसने केली.आणि त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीने कधी मोठे होऊ दिले नाही.राष्ट्रीय पक्ष असलेल्या आणि स्वातंत्र्य चळवळीत एक महत्वाचा पक्ष असलेल्या कॉंग्रेसला आणि राज्यातील कॉंग्रेसच्या छोट्या बड्या नेत्यांना कार्यकर्त्यांना…ज्यांचे थेट दिल्लीशी थेट संधान असलेले कॉंग्रेसचे नेते पुण्यात होते त्या काकासाहेब गाडगीळ,बॅरीस्टर गाडगीळ,जयंतराव टिळक यांच्या नंतर…शरद पवारांच्या मोटीला बांधले गेले हे वास्तव आहे.केंद्रात गृहमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण जेव्हा एकदा पुण्याच्या कॉंग्रेस भवनात आले तेव्हा कलमाडी नावाच्या पवारांच्या चेल्याने कॉंग्रेस हाउस ला कुलूप लावून ठेवले होते.शंकरराव यांच्या निष्ठेवर इतिहासात देखील कोणी शंका घेऊ शकणार नाही असा खमक्या नेता.पण शरद पवारांशी संधान करण्याच्या निर्णयाने त्यांची सुद्धा अवस्था अशी झाली होती.राज्यात कॉंग्रेस कोणी सर्व प्रथम हाणून पडली असेल तर ती कॉंग्रेसच्या दिल्लीश्वरांनी जवळ केलेल्या शरद पवारांनीच.बरे ते स्वतः या पक्षात राहणार नव्हते आणि राहिलेही नाहीत मात्र कॉंग्रेसच्या सहाय्याने त्यांनी आपला पक्ष घडविला.कॉंग्रेस मध्ये आपल्याला माननारी नेते मंडळी पेरली प्रशासनात पुण्याच्या कलेक्टर पासून ते दिल्लीतील पी एम ओ कार्यालयापर्यंत स्वतःचे असे आय ए एस,आय पी एस बसवून ठेवले.त्यामुळे भाजपने नाही तर सर्वप्रथम कॉंग्रेस खोकली करण्याचे काम राज्यात कोणी केले असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसने केले असेच म्हणावे लागेल.भाजपचे मुरलीधर मोहोळ नगरसेवक होते,तातडीने सलग २ वेळा स्थायी समिती अध्यक्ष आणि कॉंग्रेसच्या गिनतीत पकडले तर २ वेळा महापौर…म्हणजे ते सुमारे अडीच वर्षे महापौर होते म्हणून २ वेळा म्हटले…पण ५ वर्षात भाजपने त्यांना एवढे खंबीर करून ठेवले कि शहरभर डंका पिट्वून ते खासदार झाले आणि नंतर त्याच भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रीपद देऊन शहरचे नेतृत्व हि बहाल केले. जुन्या जाणत्यांना दूर करून स्वतःमधील वेगळ्या कौशल्याची दखल त्यांनी दाखविली आणि भाजपा नेतृत्वाने त्यांची दखल घेतली.नशीब बिशिब काही नाही …ते कसब ते कौशल्य अण्णा जोशीपासून ते अरविंद लेले सोडा तर प्रदीप रावत आणि अनिल शिरोळे यांच्यातही नव्हते. कॉंग्रेसचे वेगळे काही होऊ शकले नव्हते त्याला शरद पवार कारणीभूत होते,कॉंग्रेसचे अनेक नेते स्थानिक स्तरावर होते पण ते कायम आपापल्या वार्डात,मतदार संघातच रमले,त्यांनी कधी मोठे स्वप्न पाहिलेच तर पवारांची आघाडी ते लीलया उध्वस्त करून टाकी.बागवे गृहराज्यमंत्री झाले तेव्हा गृहमंत्री राष्ट्रवादी चे होते.
पुण्याच्या पोलीस कमिशनरपदावर भाजपा प्रेमी बसवले आणि बागवे त्यांच्यात शीत युध्द जारी ठेवले गेले.पुढे हेच कमिशनर अन्य राज्यातून भाजपचे खासदार झाले.कलमाडींना दीपक मानकर भारी होऊ लागले आणि अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मानकरांचे नाव उडविले गेले.आणि संतप्त मानकर कॉंगेस मधून बाहेर पडले.कॉंग्रेसचे अनेक आमदारही आघाडीने हळूहळू घरी बसवले हे वास्तव आहे. विठ्ठल पाटील तुपे जे जनता पक्षातून येऊन कॉंग्रेसचे खासदार देखील झाले होते आज त्यांचे पुत्र देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत.थोपटे,थिटे,मोझे असे अनेक नेते लयास गेले.ढोले पाटील राष्ट्रवादीत गेले ,
आबा बागुल तर फारच तृष्ट पद्धतीने यात भरडले गेले. त्यांना ज्या पर्वती मतदार संघातून आमदार व्हायचे होते तिथे कायम आघाडीत तो राष्ट्रवादीला दिला गेला आणि राष्ट्रवादीच्या एका गटाने बागुलांची नाराजी समोर करत आतून भाजपचा हा बालेकिल्ला बनवला.आणि आता तर पुढे कोणाची मदत नको म्हणूनच भाजपने या मतदार संघाला मंत्रीपद देखील दिले आहे. .विशेष म्हणजे कसबा मतदार संघातून ज्यांनी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली त्या कॉंग्रेसने पहिल्या महिला महापौर बनविलेल्या व्यवहारे याचे निलंबन मागे घेत कॉंग्रेसने पुन्हां त्यांना सन्मानाने पक्षात घेतले देखील.पण आबा बागुलांना आपण भर सभेत उमेदवारीचे शब्द दिले होते त्याची जाणीव न ठेवता,पक्षाने त्यांचे केलेले निलंबन मागे घेण्याची मानसिकता देखील कॉंग्रेसचेच तेच नेते दाखवायला देखील तयार नाहीत.यापेक्षा दुर्दैव कुठले. निष्ठावंतांवर असे घाव होत असलेले पाहून कुठला कार्यकर्ता अशा नेत्यांचे,पक्षाचे हात बळकट करेल.
स्वातंत्र्य चळवळीतील पक्ष,देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांचा हा पक्ष आणि त्या पक्षात ४०/ ४० वर्षे काम करणारांची हि अवस्था..?
आता सांगा या पक्षाची वाताहत कोणी लावली ?पक्ष म्हणजे काय असतोय ? कार्यकर्ता नसतोय ? कार्यकर्ता हाच पक्ष असतोय…आणि तोच कार्यकर्ता वादळाच्या घेऱ्यात असेल तर पक्षही वादळाच्या घेऱ्यात सापडल्याशिवाय राहनार नाही?

