काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘काँग्रेस मुक्त भारत’चे स्वप्न पाहणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी हे गेल्या 11 वर्षांपासून सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि संवैधानिक संस्था वापरून EVM चे शास्त्र करून ECला कवेत पकडून ‘व्होट चोरी’ करूनही काँग्रेसला संपवण्यात अयशस्वी ठरले, अशी टीका सावंत यांनी केली.
सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस पक्ष 140 वर्षे सगळी वादळे सहन करून टिकून राहिला आहे. आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध घाबरलो नाही, तर तुम्ही कोण आलात? असा थेट प्रश्न त्यांनी भाजपला विचारला. काँग्रेसला विभाजित करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत, कारण काँग्रेस ही जनचळवळ आहे. समुद्रात काठी मारल्याने समुद्र विभाजित होत नाही, असे म्हटले आहे.
नेमके सावंत काय म्हणाले?
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न बघणारे नरेंद्र मोदी गेले 11 वर्षे सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा लावून आणि संवैधानिक संस्था वापरून व्होट चोरी करून अयशस्वी ठरले.
काँग्रेस पक्ष 140 वर्षे सगळी वादळे सहन करुन टिकून राहिला आहे.इंग्रजांच्या विरुद्ध घाबरलो नाही तर तुम्ही कोण आलात? काँग्रेस विभाजित करण्याचा कितीही प्रयत्न करा. काँग्रेस ही जनचळवळ आहे. समुद्रात काठी मारल्याने समुद्र विभाजित होत नाही. बरं, इतिहासात डोकवा मुस्लीम लीग विरोधात काँग्रेस लढली तुमच्या पूर्वजांनी त्यांच्यासमवेत सरकारे स्थापन केली होती इतके तुमचे मुस्लिम लीगवर प्रेम होते. तुम्ही संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत रहा, आम्ही राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या व लोकशाहीच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावत राहू.

