तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी एका डंपर ट्रकने एका आरटीसी बसला धडक दिली. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले. बस तंदूरहून हैदराबादला जात होती.

बसमध्ये 70 हून अधिक प्रवासी होते, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी होते. ते रविवारच्या सुट्टीसाठी घरी गेले होते आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी हैदराबादला परतत होते. पोलिसांनी सांगितले की, एका वेगाने येणाऱ्या डंपरच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बसला धडक दिली. चेवेल्ला पोलिस स्टेशन परिसरातील खानपूर गेटजवळ बसचे मोठे नुकसान झाले आणि डंपरवर भरलेला खडी आत असलेल्या प्रवाशांवर पडला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. खडीखाली गाडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.या अपघातामुळे हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. चेवेल्ला-विकाराबाद मार्गावर वाहने अडकल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे. पोलिस परिस्थिती नियंत्रित करण्याचा आणि वाहतूक वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्यांनी अपघाताची संपूर्ण माहिती मागवली आहे. त्यांनी मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना जखमींना तातडीने हैदराबादला पोहोचवण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

