बुलढाणा बँकेच्या देशपांडेंच्या कारभारालाही हि धंगेकर देणार आव्हान …
लोकमान्य नगर पुनर्विकासाच्या प्रकल्प जर बिल्डर आणि रहिवासी नियम पाळून करत आहेत तर इतरांनी त्यात पडण्याचे कारण काय ?
पुणे- जैन बोर्डिंग व्यवहाराचा विषय आमचे नेते शिंदेसाहेब आणि सामंत साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे संपण्याच्या मार्गावर आहे याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे मात्र या व्यवहारात कोणी नियमबाह्य , बेकायदेशीर काय केले याची चौकशी होणे गरजेचे आहे यात बिल्डर ,ट्रस्टी जरी माघारी घेत असतील तरी धर्मदाय आयुक्तांपासून बुलढाणा बँकेच्या देशपांडे नामक अधिकाऱ्यापर्यंत कोणी काय भूमिका कशा पद्धतीने आचरणात आणली याचा तपास झाला तर अनेकांना जेल्वारी घडेल असे धंगेकर म्हणाले आहेत . रुपेश मारणे याच्या अटकेची धंगेकर यांनी थट्टा उडविली पण म्हटले , आता मला तोंड शिवून घ्यावे लागणार आहे . सत्य सत्य बोलत राहणे आता ऐकायला थकवा येईल एवढे सत्य बाहेर येऊ शकते . पण पोलीस आयुक्त मात्र चांगले काम करताहेत त्यामुळे यावर मी काही बोलणार नाही . पूर्वी म्हणालो तसे मी आता लोकमान्य नगरच्या पुनर्विकास प्रक्लापाचा मुद्दाही हातही घेणार आहे, जर बिल्डर आणि रहिवासी म्हाडाच्या नियमानुसार पुनर्विकास करून घेत आहेत तर त्यात मध्ये अन्य कोणी पडायचे कशासाठी ? हा प्रश्न आहे.
धंगेकर पुढे म्हणाले,’ मी शिंदे साहेबांशी बोललो आणि साहेबांनी जैन धर्मियांना व मला त्यांनी शब्द दिला होता की मी दोन दिवसात विषय संपेल. तो त्याप्रमाणे आता संपल्यात जमा आहे. कारण शेवटी जनतेचा एवढा प्रचंड रेटा होता आणि त्या रेट्यामुळे जैन समाज देशा मध्येच नाही तर जगा मधल्या जैन समाजाच्यामध्ये त्यांच्या मना मध्ये या प्रकाराने काहूर निर्माण केलं त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता. आणि या भावना सगळ्यांच्या लक्षात आल्या आणि आता दोन्ही पार्ट्या एका मुद्द्यावर माघारी आल्याच. पण यांच्यामध्ये जो गतिमान व्यवहार झाला, तो संशयास्पद आहे. खरेदीसाठीचे हे पैसे कुठले? कर्ज कुठल्या बँकेने दिलेत? मग या खरेदी मध्ये धर्मदाय आयुक्तांचा काय रोल का होता? प्रशासनाचा रोल काय होता? रजिस्ट्रार ऑफिसचा रोल , तहसिलदार चा रोल काय आहे? हे सगळे रोल बघता गतिमान जो व्यवहार झाला ह्याच्या मग प्रचंड पैसा पेरला गेला. म्हणजे हे काम काही बिगर पैशाचे होत नाही. आणि हा पब्लिक ट्रस्ट आहे,हा काही खाजगी ट्रस्ट नाही. त्यामुळे पब्लिक ट्रस्टवर संपूर्ण पूर्ण पणे वर्चस्व हे सरकारचं असतं. त्यामुळे ज्या पद्धतीने या ट्रस्टी ,बिल्डर, अधिकारी यांनी काही फायदा घेतलाय का? या आवारात काही तरी त्रुटी आहेत का? हे पाहिले पाहिजे म्हणून हे पहिले संचालक मंडळ बरखास्त केले पाहिजे आणि प्रशासक नेमला पाहिजे आणि प्रशासकाच्या मार्फत व समाजातील जे मान्यवर योग्य आहेत त्यांच्यामार्फत चौकशी करावी तर बिल्डर तर ह्याच्यामध्ये दोषी आहेच पण ह्याच्यामध्ये धर्मदाय आयुक्त देखील दोषी, ह्यांच्या मध्ये रजिस्ट्रार दोषी आहेत आणि ह्या बँकेत पैसा आला कुठून? हाही प्रश्न आहेच आणि ह्या बँकेला एवढी पावर येते का एवढे पैसे द्यायची ? कि त्यांचे लागेबांधे ह्या प्रकल्पामध्ये आहेत का ? ह्या बँकेत पैसा कुठून आला? हे सारं तपासले पाहिजे .
जैन समाज दानशूर आहे. तो याच्यापेक्षा दहापट पैसे उभे करू शकतो. कारण तो समाजाला कायम देत आलाय. हे पैसे परत द्या हा व्यवहार संपवा असे म्हणून कसे चालेल . एकदा जर पोलीस केस केली तर शेवटी शासन प्रशासनाला व सरकारला फसवण्याचा उद्योग बाहेर येईलच ना ? हा काही सोपा विषय नाहीये. एकदा पोलीस केस गेले तर जेलची वारी होईल त्यांना हे लक्षात घ्या .
धर्मदाय आयुक्तांनी तर मला एक भारतीय नागरिक म्हणून बलावावे यावर बोलवल्यानंतर मी त्यांना मुद्दा सांगेन. ते तो फोडून काढू शकत नाही.
सगळी सुविधा त्यांच्याकडे जातो. धर्मादाय आयुक्त आता आपण शासन व्यवस्थेवर जास्त बोलणे योग्य नाही. पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढून का? आमचं तोंड उघडं करायला लावू नका. आता झालंय ते झालंय. पण जर त्यांनी जर अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे शोभत नाही त्यांना कारण ते ज्या संस्थेवर आहेत त्यांना कशाला द्यायचं? जर तुम्हाला न्यायसंस्थेवर नेमलं त्या चौकटीच्या बाहेर जाता येतं का? स्वतः धर्मदाय आयुक्त स्वतःला क्लीन चीट देऊ शकतात काय ?. मी जाहीर बोलतो. त्यांनी त्यासाठी माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल करावा , काय? मला समज द्यावी. मी त्याला उत्तर देईन कारण ह्याच्या मध्ये न्यायसंस्था मध्ये काही लबाडी झाली. त्या लबाडी तले साक्षीदार भागिदार धर्मादाय आयुक्त आहेत
असिम सरोदे साहेब मला म्हणले कि आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एक वकील म्हणून मी आणि आमची सगळी ट्रीम. अनेक माझे वकील मित्र आहेत. सगळे म्हणले कि ह्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये तुमच्याबरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही जी बाजू मांडत आहे ती समाजाच्या हिताची म्हणजे शहराच्या हिताची. त्यामुळे तुम्ही पुणेकर म्हणून आम्ही तुम्हाला जी काही मदत करायची ती करायला तयार आहे. आणि शेवटी त्यांच्याशी मी बोलणार आहे. जे लोक माझ्या बरोबर येतील त्यांना घेऊन मी माझी बाजू मांडणार.
. त्यामुळे आता मला काही काळजी नाही. मी काही नवीन आलो नाही आणिया जनतेने मला एकदम प्रचंड प्रमाणामध्ये ताकद दिली. आशिर्वाद दिले आणि त्याच्या जोरावर जात आहे. यापुढे आपण सामाजिक जीवनामध्ये काम करताना काय काय कर्वे लागते लोकशाहीत चांगल्या माणसांना हि कधी कधी लोक शिव्या घालत असतात .
लोकमान्य नगरच्या पुनर्विकासावर बोलताना ते म्हणाले,’ पूर्वी आमचे बापट साहेब होते. आमच्या मुक्ता टिळक होत्या. आम्हीही होतो. आता आम्हाला समजत नाही असं का? आम्हाला माहिती होतं. पुनर्विकासाचा प्रयत्न काम जर रहिवासी आणि बिल्डर यांच्यात होतंय तर आपण त्यात मध्ये का पडावं ? त्यामेले काय झालं . आता शेवटी संशयाची पाल तुम्ही अंगावर घेतली. तुम्ही तो प्रकल्प वाढवला. म्हाडाचे नियम आत्ता जे आहेत त्या नियमानुसार त्यांनी तो प्रोजेक्ट चालू केला. त्याच्यामुळे त्यांनी नियम तोडून बांधकाम केले नाही हा महत्त्वाचा भाग आहे. मग तुमच्या मनात काय करायचे आहे ? १६ एकर जमिनी चे . हा बिल्डर एवढा आहे.तो बिल्डर तेवढा आहे. मग मी आणू शकतो बिल्डर . मी करू शकतो हे चाललय काय ?

