प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला त्यांच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. काही दिवसापूर्वी सलमान खानने सौदी अरेबियामध्ये एका कार्यक्रमात बलूचिस्तानला वेगळा देश म्हटलं होतं.
या त्याच्या वक्तव्यावरुन शहबाज शरीफ यांच्या सरकारने एक अधिसूचना जारी करत सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं. माहितीनुसार गृह मंत्रालयाने त्याचे नाव चौथ्या शेड्यूलमध्ये समाविष्ठ केलं आहे.
माहितीनुसार चौथ्या शेड्यूलमध्ये नाव असणं म्हणजे, त्या व्यक्तीच्या प्रत्येक हलचालीवर नजर ठेवली जाईल. परंतु याबाबत सलमान खान किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. परंतु सध्या सोशल मीडियावर सलमान खानची मोठी चर्चा होताना पहायला मिळतेय.
काय म्हणाला सलमान खान?
सौदी अरेबियामध्ये एक कार्यक्रमात बोलताना सलमान खान म्हणाला की, ‘हे बलूचिस्तानचे लोक आहेत, अफगानिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानाचे लोक आहेत. प्रत्येक जण सौदी अरेबियामध्ये मेहनतीने काम करताना पहायला मिळतय.’ सलमानच्या या वक्तव्यावर पाकिस्तानला मिर्ची लागली. कारण गेल्या काही दिवसापासून बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानातून वेगळं होण्यासाठी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे त्यात सलमानने बलूचिस्तानला पाकिस्तानला वेगळं सांगितलं.
एका बाजूला पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित केलय, तर दुसरीकडे बलूचिस्तानचे नेत्यांनी सलमान खानचे आभार मानलेत. हे सगळं असलं तरी सलमान खान अनावधानाने बोलून गेला की, त्याने हे मुद्दाम वक्तव्य केलंय, हे लवकरच स्पष्ट होईल. बलूचिस्तानमध्ये स्वातंत्र्यासाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरु आहे.
बलूचिस्तानमध्ये गेल्या काही दिवसापासून स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी अनेकदा हिंसाचाराच्या घटना घडताना दिसतात. बलूचिस्तान हा पाकिस्तानच्या सुमारे ४६ टक्के भूभागावर पसरलेला आहे, परंतु येथेची लोकसंख्या केवळ सुमारे १.५ कोटी आहे.

