नवी दिल्ली- पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यात जैन धर्मियांच्या भूखंडावरून झालेल्या वादाबद्द आज दिल्लीत देखील मध्यम प्रतिनिधींनी DCM एकनाथ शिंदे यांना धंगेकर यांच्यावर कारवाई करणार काय ? असा प्रश्न केला तेव्हा पहा काय म्हणाले एकनाथ शिंदे
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या येथील बंगल्यावर मुक्काम केल्यानंतर त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भेटीचे कारण सांगितले. ते म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान दिवाळीत बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. त्यामुळे त्यांना तेव्हा भेटता आले नव्हते. पण त्यांनी आज मला वेळ दिली होती. त्यानुसार मी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ही राजकीय नव्हे तर सदिच्छा भेट होती.एकनाथ शिंदे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जागावाटप व रवींद्र धंगेकर प्रकरणी दिल्ली दौऱ्यावर आल्याचा दावा केला जात आहे. पत्रकारांनी याविषयी त्यांना छेडले असता ते म्हणाले, मी दिल्लीत आलो तरी चर्चा होते आणि गावी गेलो तरी चर्चा होते. त्यामुळे आता चर्चा करणारे, चर्चा करतातच. त्यांचे चर्चेचे चर्वण सुरूच असते. मी माझे काम करत असतो. पंतप्रधान मोदी जे काही देशासाठी व देशाच्या प्रगतीसाठी करत आहेत, त्याचा अभिमान आम्हा सगळ्यांना आहे. त्यामुळे मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.मोदी व मी जेव्हा – केव्हा भेटतो तेव्हा आमची विकासावरच चर्चा होते. यात महाराष्ट्र व देशाच्या विकासाचाही समावेश आहे. त्यांची भेट घेतल्यानंतर मला आनंद होतो. प्रेरणा मिळते. शिवसेना एनडीएचा घटकपक्ष आहे. त्यामुळे मोदींकडून शिवसेनेला आदराचे स्थान मिळत आले आहे. याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचे व्यक्तिमत्व खूप मोठे आहे. त्यांना जगभरात विश्वगुरू म्हटले जाते. ते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्याचा आम्हाला गर्व आहे. एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची प्रतिमा आमच्या मनात आहे. मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
सर्वांनीच महायुती जपली पाहिजेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागावाटपात शिवसेनेला आदराचे स्थान मिळावे यावर तुमची मोदींशी चर्चा झाली का? असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी त्यांना विचारला. त्यावर शिंदे म्हणाले, मोदींचे एनडीए व महायुतीविषयी अत्यंत स्पष्ट मत आहे. एनडीए व महायुती ही आघाडी एक विचारधारा घेऊन पुढे जात आहे. विकासाचा अजेंडा व विचारधारा आपण राबवली पाहिजे यावर त्यांचा भर होता. महायुती व एनडीए ही प्रत्येक निवडणुकीत मजबुतीने किंबहुना विकासाच्या प्रत्येक कामात आपण एकत्र राहिले पाहिजे अशीच भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
महायुतीत एकत्र लढण्यावर कोणतेही मतभेद नाहीत. मला तसे वाटतही नाही. शेवटी कार्यकर्ते असतात. त्या त्या भागातील नेते असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही ग्रास रूटची असते. त्यामुळे कार्यकर्त्यांची ही निवडणूक लढण्याची इच्छा असते. पण अंतिम निर्णय हे वरिष्ठ घेत असतात. त्यामुळे एकदा महायुतीच्या वरिष्ठांनी निर्णय घेतला की, त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते करत असतात. कारण, आम्ही शिस्तीने चालणारे व शिस्तीने वागणारे लोक आहोत.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी पुण्यातील मुरलीधर मोहोळ व रवींद्र धंगेकर यांच्यातील राजकीय वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, रवींद्र धंगेकर माझ्याकडून निरोप गेला आहे की, महायुतीत कुठेही मतभेद होता कामा नये. महायुतीत कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये. याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मी पुण्यात गेलो तेव्हाही मी यावर भाष्य केले होते. आजही करतो. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे. महायुतीत कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचे कृत्य, वक्तव्य करू नये.पत्रकारांनी या प्रकरणी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करणार काय? असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, रवींद्र धंगेकरांना पक्षाचा जो काही निरोप मिळायचा होता तो मिळाला होता. त्यांचा जो काही दावा आहे, त्याविषयी मी त्यांच्याशी बोलेन. तेही मला भेटतील.

