पुणे- अड्ड्यावाले आणि गुत्त्यावाल्यांचा पक्ष होत चाललाय तर पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना हे माहिती आहे त्यांना वाटतेय हे बंद झालं पाहिजे. माझा राग विकृतीवर आहे, मोहोळांवर नाही . महानगरपालिकेत टेंडरमध्ये विकृती, शासनाच्या टेंडरमध्ये ही विकृती मेट्रोच्या टेंडरमध्ये ही विकृती आहे. ह्याचा जर तपास केला तर तुम्ही हिशोब लावला तर चक्कर येईल तुम्हाला अशा वाक्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिटोला लगावला आहे.
एका वृत्तपत्राच्या डिजिटल वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धंगेकर यांनी भाजपमधील अनेक जण अशा घोटाळेबाज तथाकथित नेत्यांवर नाराज आहेत असा सूर आवळला आहे ते म्हणाले ,’ माझी सातत्याने भूमिका ही असेल की अशा विकृतीच्या विरुद्ध लढणं. आणि जे पुणेकरांच्या हिताचे पुणेकरांसाठी पोषक आहे. याच्यासाठी सातत्याने मी बोलत राहिल. गुन्हेगारी जी पुण्यात चालली आहे त्यावर बोलेल अहो सातशे टोळ्या पुणे शहरामध्ये काम करतात. आणि त्या पुणेकरांना किती त्रास देतात . आमच्या माता भगिनींचे कुंकू पुसले जातं व पादचार्यांना सुद्धा मारतात . त्यातच आता म्हणजे अशी पद्धत जर या पुण्यनगरीत असेल आणि असे लोक सत्तेच्या आजूबाजूला घुटमळत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही. मला वाटतं की मी काही कोणाच्या पक्षावर बोलत नाही हा सगळ्यांचा गैरसमज आहे. मी विकृती वर बोलतोय आणि पुणे शहरामध्ये ते अड्ड्यावाले गुत्त्यावाले जे एकत्र आलेत आणि ह्या पक्षाला हायजैक करून बिल्डर लॉबीच्या हातात हात घालून ज्या पद्धतीने पुणे लुटण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर बोलणे गैर नाही. आणि माझी देवेंद्र फडणीस साहेबांना विनंती आहे की जैन बोर्डींग आणि महावीरांची मंदिर ह्याच्यावर ज्या पध्दतीनं काम करून ही जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. बँक असेन, धर्मादाय आयुक्त असतील, महानगरपालिका असेल यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. ह्या सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेवटी लोकशाही मध्ये लढणं हे आपलं लढणं आपल्या रक्तात आहे.
त्यांचाही पक्षातील अनेकांना वाटतंय की हे धंगेकर बोलतायत ते बरोबर आहे.पण ते बोलत नाही. त्यांना माहितीये की अड्ड्यावाले आणि गुत्त्यावाल्यांचा पक्ष होत चाललाय तर हे बंद झाले पाहिजे. मी ही त्यांच्या मताचा आहे. फक्त ते बोलत नाही एवढंच .
मी टीकेला घाबरत नाही. पण जर महावीरांचे देऊळ जर गहाण ठेवलं असेल तर मी बोलायचा नाही का? कोणी जर जगातला असा माणूस आला आणि म्हणला महावीरांचे देऊळ गहाण ठेवलं ,हे तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे तर मी माझं तोंड तातडीने बंद करे,न कुठलाही भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता येऊ द्यात आणि सांगू द्यात . फक्त त्यांनी सांगितलं पाहिजे.
अड्ड्यावाले आणि गुत्त्यावाले पुणेकरांना लुटत आहेत. दिवसाढवळ्या दरोडे टाकताहेत हे काही एक प्रकरण नाही. अनेक प्रकरणे आहेत याच्यावर मी बोलणार आहे. पण ही अनेक प्रकरणे आहेत. कालच एका जैन समाजाच्या एका व्यापार्याने टाकलं की माझं दोन हजार वीस साली माझे बांधकाम बंद पाडले. काहीच चूक नसताना बंद पाडले तो किती तळमळत असेल. हे लोक तळमळत आहेत. जिथं बघावं तिथं ही हीच विकृती. महानगरपालीका टेंडर मध्ये ही विकृती. शासनाच्या टेंडर मध्ये ही विकृती मेट्रोच्या टेंडर मध्ये ही विकृती . यांचा जर तपास केला तर तुम्ही चक्कर येऊन पडाल. जिथे जाल तिथे लुटायचे आणि खायचं लुटायचे आणि खायचे लुटायचे आणि यांच्या या पद्धतीवर जर बोललो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करेल का?
अहो जैन समाजाच्या ट्रस्टच्या जागेचे ज्या पद्धतीने हे सगळ मॅनेज झालेलं टेंडर आहे त्याच्यामध्ये बडेकर बिल्डर कसा काय आला? योगायोगाने आला ? मेरीट कम्पनी योगायोगाने आली? आयुक्त महानगरपालीका योगायोगाने आलेत? अहो हे सगळे ठरून आले. रेशनकार्ड काढायला दोन वर्ष लागतात यांना. आपण दहा दिवसात सगळं प्लॅन पास सगळं लोन बिन पास . आता लोन कसं काय दिलं? ह्या बँकेची चौकशी केली पाहिजेच . सत्तर सत्तर कोटी एका दिवसात देणार कुठली बँक?
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर माझा विश्वास आहे . चुकीच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांना पुरवण्याची काही एक टीम ही माझ्या मागे लागली तर ह्यात खरे काय नाय. शिंदे साहेबांवर माझा विश्वास आहे. ते कार्यकर्त्याच्या पाठिशी राहतील. कुठल्याही पद्धतीची त्यांनी मला नोटीस दिलेली नाही किंवा कुठला फोन नाही. मी जर चुकीचं वाटलो, मला कुणी सांगावं? माझ्या नेत्याने सांगितलं तर प्रश्नच नाही.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझी तक्रार केली पाहिजे. पण त्या विकृतीने नाही . प्रदीप रावत यांनी माझ्यावर तक्रार केली पाहिजे. कारण त्यांनी स्वच्छ मनाचे खासदार अशी त्यांची प्रतिमा मी पाहिली आहे. अत्यंत प्रामाणिक अशा लोकांनी केली तक्रार तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस ऐकतील. पण जे अड्ड्यावाले गुत्त्या वाले तक्रार करत असतील तर .. तर देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत. ते काय त्यांची दखल घेतील असं मला वाटत नाही.
लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे शिवसेना उभी राहते. माझं चुकीचं असेल तर मला भाजपच्या कुठल्याही लोकांनी येऊन सांगायचं माझं चुकलं. पण माझी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आमचा महावीर तुम्ही गहाण ठेवलाय. आमचं जैन बोर्डिंग युवक जे गोरगरीब युवक महाराष्ट्रात येऊन शिकतात, मोठी जातात. विद्येचं माहेरघर अनेक संस्था या पुणे शहरात आहेत. जगामधील विद्यार्थी इथे येऊन शिकायला येतात. तुम्ही त्यांच्यावर संस्कार करताय. थोडी जनाची नाही मनाची. तुम्हाला लोकप्रतिनिधी केलंय.
आमची भूमिका आहे की जैन ट्रस्टच्या जागेचा हा सगळा प्रोजेक्ट शासनाने हातात घेतला पाहिजे. ह्याच्यामध्ये भगवान महावीरांचे देऊळ दिमाखदारपणे बांधलं पाहिजे. हजारो विद्यार्थ्यांना तिथे शिकण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याचा सगळा खर्च शासनाने करावा. आणि जैन धर्माच्या लोकांच्या हातात ते द्यावं. योग्य लोकांच्या हातात देऊन तो दिमाखदारपणे ते उभं रहावं.
मी सांगतो, मी परत एकदा म्हणालो की प्रदीप रावत सारखे नेते आहेत. विजय काळे सारखे नेते आहेत. त्यांनी जर मला बोलवलं. त्यांनी नुसता फोन केला तर त्यांच्या दारात मी स्वतः जाऊन उभा राहील. पण मला ती विकृती वाल्यांनी बोलावलं तर मी कसा जाईन?
विकृतीवाल्याला फोन करायचा कसा? मला विजय काळेंनी केला पाहिजे. तेव्हा आमचे नेते प्रदीप रावत, अनिल शिरोळे यांनी बोलावलं तरी जाणार मी, अहो यांनी मोठी कामं केलीत. अनिल शिरोळे साहेबांना मी जवळून बघितलं. महानगरपालिकेत ज्या ज्या वेळेला त्यांना जर चुकीचं वाटत होतं तर पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका मांडताना मी त्यांना पाहिलंय. त्यांनी आणि रावत यांनी पक्षाच्या बाजू न पाहता जनतेच्या बाजूने शहराच्या हिताचे काम केलं. त्यांनी बोलावलं तर नक्कीच जाईन. पण मला कुणी एखाद्या घोटाळेबाजाने बोलावलं तर मी कसा जाईन?असेही धंगेकर यांनी म्हणत पुन्हा पुन्हा दंड थोपटणे सुरूच ठेवले आहे.

