Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे, पिंपरी-चिंचवड,ठाणे भाजपा स्वबळावर तर मुंबईत मात्र महायुती एकत्र लढेल- फडणवीस

Date:

पुण्यात फुटणार होते सुमारे २५ नगरसेवक,ते फुटू नये म्हणून स्वबळावर …

मुंबई- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्यापूर्वीच पुण्यासारख्या शहरात नेत्यांच्या विरोधात असलेल्या वातावरणामुळे सुमारे २५ नगरसेवक कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस यांनी मोजक्या पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, भाजप मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. यामध्ये ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिथे महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत, तिथे आम्ही वेगळे लढू. मात्र, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल. “मुंबई वगळता इतर महापालिकेत भाजप स्वबळावर लढेल. निकालानंतर काय करायचे ते ठरवू. मुंबईत एकत्र, पण राज्यात म्हणजेच इतर महापालिकांमध्ये वेगळे लढून निकालानंतर एकत्र येऊ.दरम्यान ठाणे महापालिकेत शिंदे गटाची ताकद मोठी आहे तिथे भाजपा नेमकी काय भूमिका कशा पद्धतीने राबविणार याकडे लक्ष लागून राहणार आहे .

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चा आहेत. हे दोन्ही बंधू एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कुठलीही जोखीम न घेता, मुंबई महापालिकेत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा भाजपचा विचार आहे. फडणवीस यांनी यावेळी मुंबई महापालिकेवर युतीचाच महापौर असेल, असा विश्वास व्यक्त केला.मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कसा फायदा झाला, याचे पुरावे देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यावरही त्यांनी यावेळी स्पष्ट भाष्य केले. “सध्या तरी मी वर्षावरच राहणार आहे. दिल्लीत जाण्याबाबत 2029 नंतर बघू,” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दुसरीकडे, ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे मोठे वर्चस्व असल्याने युती झाल्यास संभाव्य राजकीय नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेच्या फुटीनंतरही एका नगरसेवकाचा अपवाद वगळता सर्व नगरसेवक शिंदे यांच्यासोबत कायम राहिले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेत शिंदे गटाची ताकद मोठी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जर महायुतीअंतर्गत निवडणूक लढवली गेली, तर काही जागा भाजपसाठी सोडाव्या लागतील. याचा थेट फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. कारण, शिंदे यांच्यासोबतच्या आजी-माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात तयारी सुरू केली आहे. जागावाटपात त्यांची जागा भाजपकडे गेल्यास, या इच्छुकांच्या मनात नाराजी निर्माण होऊ शकते.

या नाराजीतून उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाकडे परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही राजकीय जोखीम टाळण्यासाठी आणि ठाण्यातील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी, युती आणि जागावाटपाचा निर्णय पूर्णपणे एकनाथ शिंदे यांनीच घ्यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय महायुतीत झाल्याची माहिती आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...