Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महायुतीच्या २३२ जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा का होता – राज ठाकरे

Date:

वेबसाइटवरून याद्या गायब झाल्याबद्दल आयोगालाच काही माहिती नाही – राज ठाकरे

मुंबई-मतदार याद्यांमधील घोळ निवडणूक आयोगासमोर ठेवल्यानंतर मला असे वाटते, ते आणि राजकीय पक्षांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत. याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २३२ जागा महायुतीच्या निवडून आल्यात. एवढ्या जागा निवडून आल्यानंतर देखील संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. जो जल्लोष व्हायला पाहिजे होता, तो नव्हता. हे कसले द्योतक आहे. निवडणुकीत पडलेल्यांना धक्का बसतोच, पण निवडून आलेल्यांना सुद्धा धक्का बसावा, ही कोणती निवडणूक आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

निवडणूक याद्यांमध्ये घोळ आहेत. हे घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींसमोर ठेवलेले आहेत. ते सुधारले पाहिजेत. ते सुधारून विरोधीपक्षाचे समाधान झाले पाहिजे. सत्ताधारी पक्षांचेही समाधान झाले पाहिजे. जे निवडणुका लढवतात, त्या राजकीय पक्षांचे समाधान झाल्याशिवाय आयोगाने निवडणुका घेऊ नयेत, ही आमची रास्त मागणी आहे. यात काहीच गैर नाही. निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा. त्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नयेत. ही सोपी गोष्टी आहे. त्यात काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. आम्ही क्लिष्ट विषय बोलत नाहीयेत, असे राज ठाकरे म्हणाले.

वृत्तवाहिनीवर खोट्या मतदार यादीची बातमी येते आणि सायंकाळी सहा वाजता ती गायब होते. त्या संपूर्ण बातमी आणि मतदार यादीबद्दल केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला काहीच माहीत नाही. आम्ही माहिती घेऊन सांगतो, असे आयोग म्हणाले. ती यादी त्यांच्या वेबसाइटवरून गायब झालीये. वृत्तवाहिनीवर दाखवल्यानंतर याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला माहिती नसेल, तर मग हे कोण करतंय? कोण काढतंय? आणि कोण घालतंय? ही बाब त्यांना विचारली गेली. त्यावर केवळ आम्ही चौकशी करून सांगतो, एवढेच निवडणूक आयोगाने सांगितले, असे राज ठाकरे म्हणाले.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काल वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आज पुन्हा एकदा विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांसोबत सुमारे तासभर बैठक झाली.

या बैठकीत ठाकरे बंधूंनी निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी आयोगाकडे केली. तर मतदार याद्यांमधील घोळावरून शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

२०२२ याद्यांमध्ये फोटो, २०२५ च्या याद्यांमधून फोटो गायब – राज ठाकरे
२०२२ मध्ये जिल्हा परिषदांच्या याद्यांमध्ये फोटो आणि नावासह सगळे आहे. पण २०२५ च्या याद्यांमध्ये फोटो काढून टाकलेत. हे सगळे निवडणूक आयोग स्वत: करतंय. पण हे का करतंय? पारदर्शकता आणत असल्याचे ते म्हणत असतील, तर या सगळ्या गोष्टी ते का आणि कशासाठी हा घोळ करत आहेत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. या देशात या पहिल्या निवडणुका नाहीत. याआधी अनेक निवडणुका झाल्या. या आधीच्या निवडणुकांमध्ये असले विषय आले नाहीत. हे विषय हल्लीच का यायला लागलेत? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक पानासाठी दोन रुपये द्यायचे, मग आम्ही पाने घ्यायची. म्हणजे त्यात पण कमाई.
मतदान गोपनीय असते, मतदार यादी गोपनीय कशी असेल? – राज ठाकरे
मतदार याद्या गोपनीय असतात, असे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितले. पण मला वाटतं मतदान गोपनीय असते ना? मतदार कसा गोपनीय असेल? दुसरी गोष्ट मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावता आणि ४५ दिवसांनंतर त्यांचे फुटेज डिलीट करता. जर निवडणूक आयोग बघू शकतो, तर आम्ही नाही का बघू शकत? निवडणूक आयोगाला निवडणुका लढवायच्या नाहीत, त्या आम्हाला लढवायच्या आहेत. निवडणूक आयोग लपवा-छपवी का करतंय? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या २४९ वाहनांवर कारवाई

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे,...

वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर हक्क वापरा – ॲड. अक्षता नेटके

एसबीपीआयएम मध्ये 'निर्भया जनजागृती' सत्र संपन्न पिंपरी, पुणे (दि. ०५...

विमा क्लेमच्या रकमेसाठी वडिलांनी घडवून आणली मुलाची हत्या

खुनासाठी दिली साडेतीन लाखांची सुपारीमुरादाबाद-विमा दाव्याच्या लोभापायी एका वडिलांनी...

4 दिवसांत 1200+ उड्डाणे रद्द, लुट अन हालापेष्टांनी प्रवासी हैराण…

नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांनी केवळ व्यक्त केली नाराजी, म्हणाले-...