पुणे: जनता पक्षातून काँग्रेसच्या काळात काँग्रेसकडून महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष पद भूषविलेले, सदानंद शेट्टी नंतर शिवसेनेत आणि पुन्हा काँग्रेस मध्ये आल्यावर आता त्यांनी पुन्हा काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपल्या पत्नी सुजाता शेट्टी, आणि PMT,शिक्षण मंडळ काँग्रेसकडून मिळविलेले भीमराव पाटोळेंनाही काँग्रेस मधून राष्ट्रवादीत आपल्यासोबत नेले आहे.
काँग्रेस मध्ये वारंवार प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले जाते,नेत्यांचा एकमेकांना पायपोस नसतो, काँग्रेस आज ना उद्या ठीक होईल असे वाटत होते पण काँग्रेस आता मूळ हेतूपासून भरकटलेला पक्ष बनला आहे असे शेट्टी समर्थकांनी या पक्ष बदलाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
सत्तेशिवाय लोकहिताची कामे करणे मुश्किल होते असेही म्हणणे त्यांनी मांडले आहे.

