पुणे, 18 सप्टेंबर 2025: भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बाबा
कल्याणी यांना ‘माननीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025’ ने सन्मानित करण्यात आले आहे.
राज्यातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये याचा समावेश होतो. जागतिक स्तरावर महाराष्ट्राला सन्मान
आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
कराड (सातारा) येथील माननीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान यांनी २०११ मध्ये या पुरस्काराची
सुरुवात केली. हा पुरस्कार विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामाची दखल घेतो. बाबा कल्याणी यांचे
औद्योगिक क्षेत्रातील काम आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना सन्मानित
करण्यात आले.
या सत्कार समारंभाला महाराष्ट्रातील मान्यवर नेते उल्हास दादा पवार आणि माननीय
बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
देशाच्या प्रगतीसाठी उद्योगांची शिक्षण, ज्ञान आणि तंत्रज्ञानाशी सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे
यावेळी बाबा कल्याणी यांनी सांगितले. भारतातील तरुणांनी केवळ तयार उपायांवरच अवलंबून न राहता
नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला कल्याणी यांनी यावेळी तरुणांना दिला. केवळ नफ्यासाठीच
नव्हे तर गाव, समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी देखील काम केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
आपल्या मातृभूमीशी जोडलेला सन्मान मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी प्रतिष्ठित ‘ पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025’ने सन्मानित
Date:

