पुणे- गेल्या 4 महिन्यांपासून (15 मे ते 15 सप्टेंबर) सतत पाऊस पडत आहे. राज्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जो शब्द दिला होता की आमचे सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी देऊ हे शब्द पाळावा आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड अस्वस्थता आहे. सरकारने जो जी आर काढला आहे त्यातून नक्की कुणाला आरक्षण मिळाले आहे हे कुणालाच समजत नाहीये. सरकारकडून कन्फ्युजिंग सिग्नल हे सरकार देत आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे. तर ओला दुष्काळ, राज्याची आर्थिक परिस्थिती असे अनेक विषय राज्यात असल्याची आठवण त्यांनी सत्ताधाऱ्यांना करुण दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले प्रेझेंटेशन करावं आणि राज्याला आज आरक्षणाची परिस्थिती काय आहे? सरकारने जो नवीन जी आर काढला आहे त्यांचा किती लोकांना फायदा होणार आहे, झाला आहे, त्यांची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे राज्यातील जनतेला समजून सांगावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे आपण त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सोबत असलेली मंत्रिमंडळातील अर्धी टीम तर तीच आहे. उद्धव ठाकरेंवर आरोप करणं हे दुर्दैवी आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा चौकशी लावा ना? उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात खूप चांगले काम केले आहे, असे भारत सरकारने म्हटले आहे. ते सरकार भाजप चेच आहे ना? मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर अशी टीका करणे अत्यंत दुर्दैवी आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिनाभरापूर्वी मी गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले होते, यावेळी मी त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अमित शहा यांच्याकडे दोन खात्यांचा कारभार आहे, एक सहकार आणि दुसरे गृह खाते. अतिवृष्टीच्या काळात एनडीआरएफची टीम मदतीसाठी येते ती गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असते. तर सरसकट कर्जमाफीची जी आमची मागणी आहे ती सहकार विभागाच्या मार्फत अर्थ मंत्रालयाकडे जात असते अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

