डीपी रस्त्याची कामे लवकर करावी म्हणून पुणे महापालिका आयुक्तांना धायरी ग्रामस्थांचा दंडवत ,म्हणाले साहेब येथे राष्ट्रपतींनी पत्र देऊनही पावसकरांनी कामे केली नाहीत .
पुणे: खासदार सुप्रियाताई सुळे धनंजय बेनकर सनी रायकर निलेश दमिष्टे काका चव्हाण प्रभावती ताई भूमकर यशवंत लायगुडे निलेश गिरमे असे अनेक मान्यवर उपस्थित असतानाही त्यांच्या समोरच ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामासाठी थेट महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे चरण धरत साहेब रस्ता करा हो … अशी विनवणी केली आणि पथ विभागाच्या प्रमुखांनी चालविलेले दुर्लक्ष याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.
धायरी गावातील रखडलेल्या डीपी रस्त्याच्या कामाला पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत भेट दिली प्रचंड लोकसंख्येच्या धायरी येथील चारही डीपी रस्त्यांच्या कामसाठी पालिकेने लाखो रुपये भरूनही हे काम अनेक महिन्यांपासून कागदावरच आहे.महानगरपालिकेच्या पथ विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार संतप्त नागरिकांनी केला आहे.या बाबत पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी महानगरपालिकेच्या पथ विभागाच्या हलगर्जीपणाकडे लक्ष आयुक्तांकडे वेधले आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,राष्ट्रपती द्रोपदा मुर्गुम यांनी धायरी येथील रखडलेल्या डीपी रस्त्यांचा प्रश्नावर कार्यवाही करण्याचे पत्र राज्य शासनाला गेल्या वर्षी दिले आहे तरीही शासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही सुरू केली नाही.
डीपी रस्त्यांच्या मोजणीसाठी पालिकेने गेल्या वर्षी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी भुमि अभिलेख विभागाला रितसर पैसे भरले आहेत मात्र भ्रष्ट कामांत अडकलेल्या भुमि अभिलेख विभागाने प्रत्यक्षात रस्त्यांची मोजणीच केली पण पूर्ण केली नाही मोजणी करायला टाळटाळ चालू आहे . उडवा उडवीची उत्तरे दिले जातात त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत.
धायरी येथील सावित्री गार्डन ते लोकमत प्रेस, काका चव्हाण बंगला ते श्री कंट्रोल चौक, बेनकर वस्ती व हायब्लिज सोसायटी ते लक्ष्मी लाॅज या चार डीपी रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.
दुसरीकडे प्रचंड लोकसंख्येच्या धायरी येथे पर्यायी रस्ते नसल्याने वाहतूक कोंडी, अपघात अशा समस्या गंभीर बनल्या आहेत.
विद्यार्थ्यांसह कामगार नागरिकांना दररोज मृत्यूशी झुंज देत प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
तरीही महानगरपालिकेने या कडे दुर्लक्ष केले आहे.
भुमि अभिलेख विभागाला रस्त्यांच्या मोजणीसाठी पालिकेने रितसर पैसे भरले आहेत मात्र भुमि अभिलेख विभाग मोजणी चे काम पुर्ण करत नाही. मोजणीसाठी कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे मात्र ते मोजणी पुर्ण करत नाही.
भ्रष्टाचारात गुंतलेल्या भुमि अभिलेख विभागाने रस्त्यांची मोजणी केली. पण नकाशा पालिकेकडे जमा करत नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत त्यामुळे नागरिकांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे
येत्या दहा दिवसांत सर्व चारही डीपी रस्त्यांची मोजणी पुर्ण न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे धनंजय बेनकर यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे होतो तो भूमि अभिलेख कार्यालय हवेली मध्ये होतो. माहिती अधिकार कायद्यामध्ये ग्रामस्थांनी अर्ज दिला मोजणी का झाली नाही म्हणून विचारण्यासाठी. त्याचे 30 दिवस झाले तरी अद्याप उत्तर नाही. माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली.

