नेपाळमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी एअर इंडियाने विशेष विमानसेवा सुरू केली आहे .अशांततेमुळे २४ तासांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर काल रात्री काठमांडू विमानतळ उघडण्यात आले. देशाबाहेर जाण्यासाठी विमानतळावर प्रवाशांची गर्दी दिसून आली.
नेपाळच्या राजधानीत अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी एअर इंडिया आणि इंडिगो काठमांडूला अतिरिक्त विमानसेवा चालवतील, असे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी बुधवारी सांगितले.
नेपाळमधील अलीकडील घडामोडींमुळे अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी एअर इंडिया बुधवार आणि गुरुवारी दिल्लीहून काठमांडू आणि परत येण्यासाठी विशेष विमानसेवा चालवत आहे.कंपनीने सांगितले की उद्यापासून त्यांच्या नियमित उड्डाणे पुन्हा सुरू होतील. एअर इंडियाने प्रवाशांना मदत करण्यासाठी त्वरित काम करणाऱ्या सरकार आणि इतर एजन्सींचे आभार मानले.विमानतळावर जाण्यापूर्वी प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटची स्थिती https://airindia.com/in/en/manage/flight-status.html येथे तपासण्याची विनंती आहे. अधिक मदतीसाठी, कृपया आमच्या 24×7 कॉल सेंटरशी 011-69329333 / 011-69329999 वर संपर्क साधा.असे एअरइंडियाने रात्री जाहीर केले आहे .
बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी भारताच्या परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली आहे. परराष्ट्र सचिवांनी नेपाळमध्ये अडकलेल्या सुमारे १,००० भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन दिले आहे.
नेपाळमधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे, ६-७ कॅबिनेट मंत्री, अनेक महापौर, परिषद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधींनी आपले प्राण वाचवण्यासाठी भारतातील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला आहे. निदर्शकांचा रोष थेट त्यांच्यावरच उफाळून आला आहे.
अनेक मंत्री आणि नेत्यांच्या खाजगी निवासस्थानांवर जाळपोळ आणि तोडफोड झाली आहे. आंदोलक त्यांचा शोध घेत आहेत. म्हणून, त्यांनी नेपाळच्या सीमेवरील भारतीय शहरे, रक्सौल, आदापूर, भेलाही, छोडाडानो, मोतिहारी, बेतिया, अरेराज, केसरियाकडे वळले आहे.
नेपाळमधून पळून गेलेल्या ३५ कैद्यांना भारतीय सीमा दलाने पकडले
भारतीय सशस्त्र सीमा दलाने (SSB) आतापर्यंत नेपाळच्या तुरुंगातून पळून गेलेल्या ३५ कैद्यांना पकडले आहे. यापैकी २२ कैदी उत्तर प्रदेशातील भारत-नेपाळ सीमेवर, १० बिहारमध्ये आणि तीन बंगालमध्ये पकडले गेले. अधिकाऱ्यांच्या मते, ही संख्या आणखी वाढू शकते.
मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांतील तब्बल 100 जण हिंसाग्रस्त नेपाळमध्ये अडकल्याची माहिती आहे. सरकार या सर्वांची तेथून सुखरूप सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळमधील उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नेपाळचा प्रवास टाळावा, तसेच सध्या जे नागरीक नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. विशेषतः या प्रकरणी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती दिली. ते म्हणाले, नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणं आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणं हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन आहे.
राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खाजगी वाहनानं परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे, असे ते म्हणालेत.
आपत्कालीन मोबाईल क्रमांक जारी
आपत्कालीन कार्य केंद्राने मदतीसाठी नेपाळमधील 977-980 860 2881 आणि 977-981 032 6134 हे दोन मोबाइल क्रमांक, तर राज्यातील 91- 9321587143 व 91-8657112333 हे मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या क्रमांकांवर संबंधितांना व्हॉट्सअॅप कॉलही लावता येणार आहे.
नेपाळमध्ये वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर, माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली, सीपीएन (माओवादी केंद्र) अध्यक्ष पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ आणि सीपीएन (युनिफाइड सोशालिस्ट) अध्यक्ष माधव कुमार नेपाळ यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना नेपाळी सैन्याने शिवपुरीतील सुरक्षित ठिकाणी नेले आहे.शिवपुरी राजधानी काठमांडूपासून सुमारे ३० किमी अंतरावर आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवारी दुपारी या नेत्यांना शिवपुरीतील आर्मी कमांड अँड स्टाफ कॉलेजमध्ये नेण्यात आले.
त्याच दिवशी दुपारी २ वाजता ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर लगेचच लष्कराने त्यांना बालुवातारहून शिवपुरी येथे विमानाने नेले. याशिवाय, उपपंतप्रधान आणि नगरविकास मंत्री प्रकाश मान सिंह, उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री बिष्णू पौडेल यांनाही सैन्याने त्यांच्या भैस्पती येथील निवासस्थानावरून शिवपुरी येथे विमानाने नेले. प्रचंड आणि माधव नेपाळ यांना सिंह दरबारातून तेथे नेण्यात आले.
मंगळवारी दुपारी प्रचंड यांनी सिंह दरबार येथे विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती, ज्यामध्ये माधव नेपाल देखील उपस्थित होते. याच दरम्यान प्रचंड यांच्या निवासस्थानी आग लागल्याची बातमी आली. यानंतर, लष्कराने तातडीने कारवाई केली आणि सर्व वरिष्ठ नेत्यांना सुरक्षित ठिकाणी नेले.

त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयातील न्यायवैद्यकीय औषध विभागातील अधिकाऱ्यांच्या मते, जिथे आंदोलकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत, आतापर्यंत २५ बळींची प्राथमिक ओळख पटली आहे. सहा मृतांपैकी, ज्यांची ओळख अद्याप कळलेली नाही, त्यापैकी एक महिला आहे.“आम्ही आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार शवविच्छेदन केले आहे,” असे विभाग प्रमुख डॉ. गोपाल कुमार चौधरी म्हणाले. “आम्हाला मृतदेह साठवून ठेवण्यास सांगितले आहे; आम्ही मृतांची माहिती उघड करू शकत नाही.”
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बहुतेक मृतांची ओळख घटनास्थळांवरून मिळालेल्या कागदपत्रांनुसार किंवा कुटुंबातील सदस्यांच्या ओळखीवरून निश्चित करण्यात आली आहे.“आम्ही बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना ओळख पटविण्यासाठी मृतदेह दाखवत आहोत,” चौधरी म्हणाले.

