Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मराठा आंदोलनाभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात, मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही-जरांगे पाटील

Date:

मुंबई खाली झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी कोर्ट प्रत्यक्ष जाणार: अवमाननेची कारवाई करण्याचा कोर्टाचा इशारा 

3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा, हायकोर्टाचे सरकारला आदेश
कालच्या याचिकेतील काही गोष्टींकडे कानाडोळा करता येणार नाही. मुंबई खाली झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी कोर्ट आपला प्रतिनिधी पाठवून पडताळून पाहील. विशेषतः गरज पडली तर आम्ही स्वतः तिकडे जाऊन पाहू. कोर्ट या प्रकरणी अवमाननेची कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाशी संबंधित 3 याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने ही भूमिका घेतली आहे. कोर्ट आता या प्रकरणी 3 वा. सुनावणी करणार आहे.

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान नियमांची पायमल्ली झाल्याचं निरीक्षण नोंदवत काल मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. आम्ही दिलेले नियम डावलण्यात आल्याचं सांगत मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार घेत सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. “आमची मागणी मान्य केली नाही तर शनिवारी आणि रविवारी अत्यंत मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत येतील आणि मग सोमवारचं आंदोलन छान होईल,” असा सूचक इशारा जरांगे यांनी दिला आहे.मराठ्यांनी रस्ते मोकळे केलेत, पण आझाद मैदान सोडणार नाही. असा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे पाटील यांनी घेतला आहे. मुंबई पोलिसांनीजी नोटीस आम्हाला दिली आहे. त्याला आमचे वकील उत्तर देतील. मनोज जरांगे पाटील आझाद मैदान सोडणार नाहीत, आम्हाला आंदोलन करण्यापासून कुणीही थांबू शकत नाही. काल कोर्टाने जे निर्देश दिले, त्याचं आज संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी पालन करताय. सगळे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. मनोज दादांनी सांगितल्यानंतर सगळी वाहनं आणि मराठा बांधव हे मुंबईच्या बाहेर जाऊन थांबले आहेत. अशी माहिती ही मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे पाटील यांनी दिली आहे.

सरकारवर हल्लाबोल करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “कोर्टाने आदेश दिल्यानंतर आम्ही रस्त्यावरच्या गाड्या लगेच हटवल्या आहेत. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. परंतु मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही. हैदराबाद आणि सातारा संस्थानचे गॅझेटियर लागू करा. मराठा आणि कुणबी एकच आहेत हा शासन निर्णय जारी करा. फडणवीसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. ते कोर्टाकडे चुकीची माहिती देतात. पण आम्ही आझाद मैदानातून हटणार नाही,” अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.मी मेल्यानंतरही तुम्ही शांत रहा, तुम्हाला काय करायचे तुम्ही पाहा- जरांगे
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही, त्यानंतर जे होईल ते तु आणि मराठे पाहून घ्या. सरकार कुठल्याही थराला गेले तर मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. मराठे काय आहेत हे बघायचे असेल तर मी काही करु शकत नाही. मराठा बांधवांनी शांत रहायचे, मला काहीही झाले तरी शांत रहायचे. मी मेल्यानंतरही तुम्ही शांत रहा. तुम्हाला काय करायचे तुम्ही पाहा. मरेपर्यंत मी मुंबई सोडणार नाही देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगतो.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पोलिसांना सांगून तुम्ही जर पोरांवर लाठीचार्ज केला तर तो सर्वांत मोठा डाग असेल. तुमच्या लोकांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे. तुमच्या नेत्यांना आणि लोकांना राज्यात फिरायचे आहे हे लक्षात ठेवा. शांततेत प्रश्न सोडवा. पोलिसांकडून त्यांचा अपमान होऊ देऊ नका. तसे झाले तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल. त्यामुळे गोडीत जे करता येईल ते करा. तुम्ही ज्यांच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास साडे 9 पट जास्त आहे. जिकडे घुसायचे नाही तिकडे घुसू नका.

“जे कधीही रद्द होणार नाही, पिढ्यान् पिढ्या टिकेल, असं आरक्षण मला माझ्या समाजाला द्यायचं आहे. मी बरोबर करतो, फक्त पोरांना तुम्ही शांत राहा. मला किंवा माझ्या समाजाला डाग लागेल, मान खाली घालावी लागेल, असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, तुम्ही शांत राहा,” असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केलं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...