मुंबई- जरांगेंना भेटून परत जाताना काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या. या घटनेनंतर आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.सुप्रिया सुळे यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर मुंबई पोलीस आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकप्रतिनिधी मनोज जरांगे यांची भेट घेऊन येत आहेत. पण सुप्रिया सुळे यांनाच अशाप्रकारे वागणूक का दिली गेली? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांची कुमक आझाद मैदानात आहेच, पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’ घराबाहेरही पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची अनपेक्षित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.दरम्यान, आझाद मैदानात आता गर्दी वाढताना दिसत आहे. राज्यभरातील मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून आहे. आंदोलनासाठी आलेले आंदोलक मुंबईतील विविध ठिकाणी फिरताना देखील बघायला मिळत आहेत. अनेक आंदोलक मरीन ड्राईव्ह परिसरात बघायला मिळाले. विशेष म्हणजे काही जण थेट समुद्रात उतरलेले बघायला मिळाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समुद्राच्या बाहेर काढलं. समुद्रापासून लांब उभं राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. मुंबई पोलिसांकडून आंदोलकांच्या सुरक्षेसाठी देखील सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
सुप्रिया सुळेंना नेमके घेरलं कोणी ? शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली,मुंबई पोलीस सतर्क..
Date:

