मनोज जरांगे म्हणाले की, मी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही. पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका. मराठा प्रश्नाबद्दल राज ठाकरेंनी बोलू नये. ते मराठवाड्यात का येतात, नाशिकमध्ये का जातात आम्ही विचारले का? राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत. फडणवीस त्यांच्या घरी जाऊन चहा पिले की इकडे पक्ष संपला तरी त्यांना काही फरक पडत नाही. दोन्ही ठाकरे बंधू चांगले आहेत.आंदोलन संपल्यावर नीतेश राणे यांच्यामध्ये कीती दम आहे, मी बघतो. नारायण राणेंना मी समजून सांगितले होते पण ते ऐकत नाही.असेही ते म्हणालेत
मुंबई-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये चिंता वाढली आहे.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकार मागण्या करत नाही म्हणून मी आता उद्यापासून पाणी सुद्धा बंद करणार आहे.
मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांचे नुकसान- शाह
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडे तोडगा काढण्याची मागणी केली आहे.आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट फटका येथील व्यापारी आणि व्यावसायिकांना बसत आहे. शनिवार आणि रविवार सारख्या सुट्टीच्या दिवसांत हे आंदोलन सुरू असल्यामुळे व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे, असे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.

