मुंबई-मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही गणरायाचे आगमन झाले असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले- सर्व संकट दूर व्हावेत अशी मी प्रार्थना करतो
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आज गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असून, घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्रीगणेश आपले आराध्य दैवत आहेत, ते विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे आपल्या देशावर येणारे सर्व संकट दूर करण्यासाठी मी प्रार्थना करतो.


