पुणे (दि.२४) डॉ.अनिल धनेश्वर लिखित “विकसित भारत २०४७” पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या टाटा सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री मा.प्रकाश जावडेकर, प्रमुख वक्ते भारतीय रिझर्व बँकेचे माजी कार्यकारी संचालक डॉ.आर.बी.बर्मन, सन्मानार्थी प्रा.डॉ.मुकुंद महाजन, आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी मुकुंद लेले,निरंजन आगाशे, अनघा कऱ्हाडे, हेमांगी ताम्हणे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी विकसित भारत २०४७ ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असून त्या अनुसार ते विविध योजना व उपक्रमाचे आयोजन करीत आहेत असे सांगितले. डॉ.आर.बी बर्मन यांनी कोणतेही बदल लगेच होत नाही त्यासाठी काही कालावधी लागतो, व सर्वांनी त्यात सहभागी होणे महत्वाचे असते असे सांगितले. लेखक डॉ.अनिल धनेश्वर यांनी विकसित भारत या संकल्पनेवर लिहिलेल्या अनेक लेखांचा यात समावेश असून २०४७ मध्ये देश विकसित भारत होणार याची खात्री असल्याचे सांगितले. पुस्तकाची पाने २०६ असून किंमत ५००/- रुपये आहे.
विकसित भारत २०४७ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न.
Date:

