Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जागतिक शांततेसाठी मानवता सर्वात महत्वाची

Date:

विश्वशांती दर्शन वाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त माजी राज्यसभा सदस्य सुनील शास्त्री यांचे विचार
पुणे” मानवतेचा प्रचार करायचा असेल तर मानवता अंगीकारणे सर्वात महत्वाचे आहे. जर मानवता नसेल तर जागतिक शांती कशी येईल. सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती शांती विसरला आहे. अशा वेळी जयपूरमध्ये भारतरत्न लाल बहाद्दू शास्त्री यांच्या नावाने विश्वधर्म संग्रहालय बांधून जागतिक शांतीचा नारा दिला जाईल.” असे विचार माजी राज्यसभा सदस्य आणि भारतरत्न लाल बहाद्दूर शास्त्री यांचे सुपुत्र सुनील शास्त्री यांनी व्यक्त केले.
माइर्स एमआयटी ने सुरू केलेल्या विश्वशांती दर्शन वाहिनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी अ‍ॅड गुरू भारत दाभोळकर आणि श्रीमती शास्त्री सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माइर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच विश्वशांती दर्शन वाहिनीचे सीईओ डॉ. मुकेश शर्मा आणि प्रसिद्ध कवी डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
सुनील शास्त्री म्हणाले,” जय जवान, जय किसान हा नारा देणारे भारतरत्न लाला बहादूर शास्त्री यांनी नेहमीच देशाच्या कल्याणाचा विचार केला. या नार्‍यामुळे संपूर्ण देश एक झाला. त्याच मार्गावर चालत डॉ. विश्वनाथ कराड यांनी जागतिक शांती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आहे. ते विश्वशांती दर्शन वाहिनीद्वारे शांतीचा संदेश पसरवत आहेत आणि सर्वांच्या मनात शांतीचे बीज पेरत आहेत.”
” विद्यार्थी जीवनाची गोष्ट सांगतांना सुनील शास्त्री म्हणाले की, माझ्या बालपणी माझे वडील लाल बहादूर शास्त्री यांना २१ दिवस भेटू शकलो नाही. त्यानंतर मला राग आला आणि मी माझ्या वडिलांशी तो विषय बोललो. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी उत्तर दिले की, बेटा येथील लोकांनी मला देशातील सर्वोच्च पदावर बसवले आहे. म्हणून भारत देश हा माझे संपूर्ण कुटुंब आहे. त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. म्हणूनच मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटू शकलो नाही. डॉ. कराड देखील या जागतिक विचारसरणीवर विश्वास ठेवणार्‍या शास्त्रीजींच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत.”
आपल्या स्वागत पर भाषणात डॉ. मुकेश शर्मा म्हणाले, या वाहिनीचा पाया वसुधैव कुटुंब कमच्या विचासरणीवर आणि जागतिक शांतीच्या तत्वावर रचला गेला आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला शांती कशी मिळू शकते या विषयावर सतत प्रसारण केले जात आहे. त्यानंतर भारत दाभोळकर यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले.
येथे डॉ. विश्वनाथ कराड यांच्या जीवनकार्यावर आधारित लघु चित्रपट दाखविण्यात आला.
विद्यार्थीनी संज्ञा उपाध्ये हिने आपल्या सुरेल आवाजात सूत्रसंचालन करून प्रेक्षकांची मने जिंकली. डॉ. संजय उपाध्ये यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...