पुणे, १८ ऑगस्टः” गेल्या ७८ वर्षांमध्ये देशाने तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात उत्तुंग झेप घेऊन विकसीत भारताची घोडदौड सुरू केली आहे. देशातील प्रत्येकाला प्रगतीचे द्वार खुले करून आत्मनिर्भर भारताची नींव रोवली आहे. देशाला आकार देण्यासाठी युवकांबरोबरच प्रत्येक नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.” असे मत ले. जनरल धिरज सेठ यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने कोथरुड कॅम्पस येथे ले. जनरल धीरज सेठ व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७९ वां स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी व डब्ल्यूपीयूचे कुलसचिव गणेश पोकळे उपस्थित होते. तसेच संस्थेचे सर्व संचालक, प्राध्यापक, कर्मचारी व हजारो विद्यार्थी उपस्थित होते.
ले. जनरल धीरज सेठ म्हणाले,”राष्ट्रपिता म. गांधी यांनी अहिंसेचा नारा दिला तर सुभाषचंद्र बोस यांनी सेना उभी करून देशाला सशक्त बनविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे हा मंत्र देऊन क्रांतीचे बीज पेरल्याचे त्यांनी सांगितले.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”भारतमातेसाठी समर्पित भावना जागविण्याचा हा दिवस आहे. शिस्त, चारित्र्य आणि समर्पण या गोष्टींच्या आधारे प्रत्येकाने देशसेवा करावी. तसेच प्रत्येकाने माता, पिता आणि देशसेवेचे कर्तव्य बजावावे. भारताजवळ विश्वगुरू बनण्याबरोबरच जगाला सुख, शांती आणि समाधान देण्याची शक्ती आहे.”
डॉ.प्रसाद खांडेकर यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकांनी कार्य करण्याचे सांगितले. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले. विद्यार्थी पृथ्वीराज शिंदे यानी सर्वांनी शपथ दिली.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व अक्षिता सक्सेना यांनी आभार मानले.
विकसित भारतासाठी युवकांची भूमिका महत्वाची – ले. जनरल धिरज सेठ
Date:

