पुणे -महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दोन तीन दिवसात प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. दरम्यान मतपत्रिकेवर मतदान घ्यावे आणि एक वार्ड एक नगरसेवक एक मतदार एक मतदान या जुन्याच पद्धतीने लोकाना आजही मतदान पद्धतीवर गाढ विश्वास आहे.EVM आणि प्रभाग पद्धतीला मतदारांचा विरोध होऊ लागला आहे असे असताना निवडणूक आयोग मात्र मनमानी कारभार करत असल्याचा आरोप होत असताना महापालिकेची निवडणूक होणार आहे.
या संदर्भात उज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,प्रशांत बधे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे कि,’या दोन-तीन दिवसात प्रभाग रचना जाहीर होणार आहे या विषयात आम्ही थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार आमच्या मते जुने जे प्रभाग आहेत ते साधारणपणे तसेच राहत आहेत फक्त त्यातील काही भाग वाढेल व कमी होईल साधारणपणे सर्व प्रभागांमध्ये 90 ते 95 हजार मतदार असतील असे गृहीत धरल्यास आत्ताच्या असलेल्या प्रभागात 12 15 याद्या वाढवाव्या लागतात त्या प्रशासनाच्या सोयीनुसार ते वाढवतील असे वाटते तसेच काही ठिकाणी नाला ही हद्द धरल्यामुळे काही प्रभागाचे मात्र दोन भाग होतील त्यातील एक भाग शेजारच्या प्रभागाला जोडला जाईल तर दुसऱ्या भागामध्ये चार चा प्रभाग करताना नवीन मोठा भाग जोडला जाईल अशी अशी प्रभाग रचना साधारणपणे आहे
जुन्या पुण्यातील प्रभाग मध्ये मतदार संख्या साधारणपणे 90000 ते 95 हजार असु शकते तर खडकवासला पासून केशवनगर पर्यंत नवीन आलेली सर्व गावे ही आत्ता असलेल्या प्रभागांना जोडू शकतात यामध्ये उदाहरण म्हणून जुना धायरी चा प्रभाग त्याला उर्वरित धायरी व खडकवासला नांदेड नांदोशी किरकटवाडी हा भाग जोडला जाऊ शकतो फक्त वाघोली लोहगाव मध्ये एखाद्या वेळेला स्वतंत्र प्रभाग होऊ शकतो असा आमचा अंदाज आहे हे आम्ही वेळोवेळी वर्तमानपत्राच्या द्वारे जी माहिती येत होती व लोकसंख्येची 2००7 परिस्थिती या आधारे अभ्यास करून केला आहे बघू आमच्या अभ्यासाला कितपत यश मिळते ते 22 तारखेला समजेल
आयुक्त साहेबांनी ऐकले सर्वांचे आणि केले मनाचे…अर्थात मार्गदर्शक तत्त्वा नुसार …अशी माहिती आहे,खरे खोटे प्रभाग जाहीर झाल्यावर कळेल.

