हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवले:दुसऱ्या धर्मियांनी नाही, त्यामुळे हिंदूंचे संरक्षण आमची जबाबदारी – नीतेश राणे

Date:

रत्नागिरी-राज्यातील महायुतीचे सरकार हिंदू समाजाच्या पाठिंब्यामुळेच सत्तेत आले आहे. अन्य धर्मियांनी आम्हाला मतदान केले नाही, असे विधान मत्स्य आणि बंदरे खात्याचे मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे. त्यामुळे हिंदू समाजाचे रक्षण करणे, आमचे कर्तव्य असल्याचे राणे म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात संवाद साधताना नीतेश राणे उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, राज्यातील महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे. इतर धर्मियांनी मतदान केले नाही. तुम्ही मोहल्लात फिरलात पण तुम्हाला त्यांचे मतदान झाले नाही. हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवले, त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणे, त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे.

नीतेश राणे म्हणाले, केवळ विकास साधून उपयोग नाही, जर आपल्या राज्यातील महिला सुरक्षित नसतील, तर त्या विकासाला अर्थ नाही. अवतीभवती पाहत असताना लव्ह जिहाद सारखे प्रकरणे दिसतात तेव्हा हिंदुत्ववादी सरकार का असावे यांची जाणीव होते. लव्ह जिहादसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी हिंदुत्ववादी सरकार असणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.

राखी संकलन कार्यक्रमाचा उल्लेख करत नितेश राणे म्हणाले की, राज्यात जिहादच्या निमित्ताने वाकड्या नजरेने आपल्या माता-भगिणींकडे पाहिले जाते. त्याला राखी संकलन हे उत्तर आहे. आज 14 हजार राख्या जमा केल्या असून, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या. या उपक्रमामुळे हिंदुत्व अधिक भक्कम होईल.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, “लव्ह जिहाद सारखी प्रकरणे गावागावात होत आहेत. रत्नागिरीत असे अनेक प्रकरणे होत आहेत. याला एकच सक्षम उत्तर आहे की आपण हिंदू म्हणून खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे. आमच्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला जाग्यावर ठेवणार नाही ही भावना प्रत्येकाची असायला पाहिजे.”

नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत असताना, आपला एक भाऊ ही जबाबदारी पार पाडत असल्याची राज्यातील महिलांची भावना आहे. मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यात कोणीही आमच्या महिला भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, लव्ह जिहाद सारखे विषय करू शकत नाही, अशी भावना प्रत्येक बहिणीच्या मनात आहे, असे नीतेश राणे म्हणालेत.

सरकार आणणे हे कार्यकर्त्याचे काम आहे. त्यामुळे सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. कार्यकर्त्यांमुळेच आपल्याला पदे मिळाली आहेत आणि त्यांचा उपयोग कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी केला जाईल, असे नीतेश राणे यांनी म्हटले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्वेनगर दुर्घटनेतील जखमी रुग्णाची महापौर मंजूषा नागपूरे यांनी दीनानाथ रुग्णालयात घेतली भेट

पुणे :कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीसमोर झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी...

नदीपात्र खराब करणारांवर तातडीने कडक कारवाई करा – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे- पुण्याच्या नदीपात्रात कचरा , राडारोडा टाकून अगर अन्य...

तिसऱ्या तिमाहीत भारत फोर्ज ला संरक्षण क्षेत्रातील १,८७८ कोटी रूपयांच्‍या ऑर्डर्स

भारत फोर्जकडून आर्थिक वर्ष २०२६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत प्रबळ...

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून दिरंगाई ही खूप क्लेशदायी -आ.हेमंत रासने

शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गांचा डीपीआर तात्काळ करा! -आ.हेमंत...