‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’तर्फे अवयवदान जनजागृती व संकल्पासाठी ‘जिंदगी मिलेगी दोबारा’ अभियान सुरू

Date:

पुणे१४ ऑगस्ट २०२५ – देशात लाखो रुग्णांना योग्य ते आवश्यक अवयव उपलब्ध नसल्याने जीव वाचविण्यासाठी अवयव प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्रि हॉस्पिटल्सने ‘जिंदगी मिलेगी दोबारा’ हे मोहीम सुरू केली आहे. अवयवदानाबाबत सर्वसामान्यांत जागृती निर्माण करणे आणि नागरिकांना अवयवदानाची शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. भारतामध्ये मृत व्यक्तींच्या अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. देशात अवयवदानाचा दर दशलक्ष लोकसंख्येमागे १ पेक्षा कमी आहे. सन २०२४ मध्ये देशात सुमारे १८,९०० अवयवांचे प्रत्यारोपण झाले असून भारत जागतिक स्तरावर संख्येनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही, दरवर्षी अंदाजे १.७५ लाख रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते, तर यकृत, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी प्रत्येकी सुमारे ५० हजार रुग्ण प्रतीक्षेत असतात. सह्याद्रि हॉस्पिटल्सचे हे अभियान दि. १३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत, जागतिक अवयवदान दिनापासून सुरू होऊन, पुणे, नाशिक, कराड व अहिल्यानगर येथील सर्व सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये राबवले जाणार आहे. यात सोशल मीडियावरील व्हिडिओ, आवाहने, गैरसमज दूर करणारी माहिती यांचा प्रसार करण्यात येईल, तसेच प्रत्यक्ष लोकसंपर्क साधणाऱ्या उपक्रमांतून नागरिकांना अवयवदानाचा संकल्प करण्यासाठी प्रेरित केले जाईल. समाजातील एखाद्या नागरिकाला तुमच्यामुळे जीवनदान मिळू शकेल, असे आवाहन केले जाईल.

या आठवड्याच्या सुरुवातीला, सह्याद्रि हॉस्पिटल’मध्ये मेंदूमृत घोषित झालेल्या एका २१ वर्षीय दात्याने पुण्यातील पाच गंभीर आजारी रुग्णांचे जीव वाचवले. अपार धैर्य व करुणा दाखवत या दात्याच्या कुटुंबाने जीवनाची अमूल्य भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यकृत, हृदय, फुफ्फुस व मूत्रपिंडाच्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना प्रत्यारोपण मिळाले. एका छोट्या निर्णयाचा परिणाम किती विलक्षण असू शकतो आणि फक्त संबंधित रुग्णांनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांना व समाजालाही कसा दिलासा मिळू शकतो, हे अशा घटनांमधून दिसून येते. म्हणूनच अवयवदानाचा संकल्प हा सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे.

या मोहिमेअंतर्गत नागरिक www.ZindagiMilegiDobara.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन संकल्प करू शकतात किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या विविध युनिट्स, कॉर्पोरेट ऑफिस, मेट्रो स्थानकांवरील अवयवदान केंद्रांमध्ये जाऊन संकल्प नोंदवू शकतात. इच्छुकांना या संपूर्ण प्रक्रियेत प्रशिक्षित स्वयंसेवक मार्गदर्शन करतील.

वेबसाइटद्वारे संकल्प करणे असो, QR कोड स्कॅन करणे असो किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होणे असो, ही प्रत्येक कृती कोणाचे तरी प्राण वाचवू शकते. अवयवदानाचा संकल्प करून तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात नायक बनू शकता — आणि यंदा रुपेरी पडद्याचा नायक, बॉलीवूडचा आयकॉन अनिल कपूर यांना भेटण्याची संधीही मिळवू शकता!

आता संकल्प करा: www.ZindagiMilegiDobara.com

स्कॅन करा आणि संकल्प करा. कुणाच्या तरी जीवनात सुपरस्टार बना.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबीयांच्या डोक्यावर मायेचा हात…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली स्वर्गीय विदीप जाधव...

बेकायदेशीर रसायनांचा वापर केल्यामुळे  ‘कॉम्फर्ट’ अगरबत्तीवर बंदी

Mumbai February 02, 2026: भारतामध्ये घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित वापरास प्रोत्साहन देणाऱ्या ना-नफा तत्वावरील उद्योग मंडळ होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) तर्फे बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्ती ‘कॉम्फर्ट’ विरोधात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. ‘कॉम्फर्ट’ ही डास प्रतिबंधक अगरबत्ती महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे विक्रीस उपलब्ध असून ती मेसर्स धूप छांव कंपनी यांचे उत्पादन आहे. खुल्या बाजारातून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांवरून हे उत्पादन अनभिज्ञ ग्राहकांकडून खरेदी केले जात असल्याचे स्पष्ट झाले असून, महाराष्ट्र कृषी विभागाने केलेल्या प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये ‘कॉम्फर्ट’ मध्ये बेकायदेशीर आणि मान्यता नसलेले रसायन डाइमफ्लुथ्रिन आढळून आले आहे. ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक तसेच उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीस असल्याचे सांगितले जाते. मुंबईमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना डाइमफ्लुथ्रिन असलेल्या ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्यांचे अनेक बॉक्स आढळून आले. धूप छांव कंपनी कडे परवाना तसेच CIBRC मान्यता या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे, कीटकनाशके अधिनियम, 1968 आणि कीटकनाशके नियम, 1971 अंतर्गत या उत्पादनाचे उत्पादन व विक्री बेकायदेशीर ठरते. हर्बल असल्याचा खोटा दावा करत अनेक बेकायदेशीर अगरबत्त्या विक्रीस आणल्या जात असून, त्यामध्ये बेकायदेशीर आणि शासनमान्य नसलेली रसायने वापरली जात आहेत. ‘कॉम्फर्ट’, ‘स्लीपवेल’ आणि ‘रिलॅक्स’ या नावांनी विक्री होणारी उत्पादने यामध्ये ओळखली गेली आहेत. यामुळे भारतभर मान्यता नसलेली कीटकनाशके असलेल्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्यांविरोधात अंमलबजावणी कारवाईत वाढ झाली असून, नियामक सतर्कता आणि सार्वजनिक आरोग्याबाबतची चिंता अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येते. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIBRC) ही वैधानिक संस्था असून, भारतात डास प्रतिबंधकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांना उत्पादन, आयात किंवा विक्रीपूर्वी मंजुरी व नोंदणी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शासनमान्य CIBRC-मान्यताप्राप्त डास प्रतिबंधक उत्पादनांवर नोंदणी क्रमांक (CIR –...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच पक्षाध्यक्ष हव्यात,चित्रपट व सांस्कृतिक विभागाची आग्रही मागणी

पुणे-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच पक्षाध्यक्ष हव्यात अशी आग्रही मागणी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिली नेतृत्वाची संधी

महिलांसाठी महापौरपद आरक्षित नसताना ‘लाडक्या बहिणीं’कडे जबाबदारी; हा शिवसेनेचा...