निवडणूक आयोगाकडून विरोधकांची मुस्कटदाबी,चर्चेला येणाऱ्या खासदारांवर केली पोलीसांमार्फत कारवाई

Date:

संजय राऊतांसह अनेकांना दिल्लीत अटक

इंडिया आघाडीच्या वतीने मतदान चोरीचा आरोप करत संसद ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये असंख्य खासदार सहभागी झाले असून, महाराष्ट्रातील काही खासदारांचा समावेश आहे. या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांसह अनेकांना अटक करण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून विरोधकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

आमची ही लढाई शांततेच्या मार्गाने सुरू राहील, असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तर आम्ही मोर्चावर ठाम असून, आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे खासदार नीलेश लंके म्हणाले. दरम्यान, या मोर्चावरून भाजप नेते राम कदम यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूक याद्यांच्या विशेष सघन सुधारणा (SIR) आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत “मतदार फसवणूक” झाल्याच्या आरोपांविरुद्ध निषेध करण्यासाठी संसदेपासून भारतीय निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे 300 खासदार सहभागी झाले आहेत. सध्या मोर्चा पोलिसांनी अडवला असून आंदोलकांना संसद पोलिस ठाण्यात नेले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेते सामील झाले आहेत.

मोर्चात सहभागी झालेल्या सुप्रिया सुळे यांनी वृत्त संस्थेशी बोलताना म्हटले की, आमची लढाई ही शांतीच्या मार्गाने सुरू राहील. तसेच आम्ही महात्मा गांधींना आदर्श मानतो. त्यामुळे त्यांच्या तत्त्वानुसार आम्ही पुढील लढाई लढणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.खासदार नीलेश लंके म्हणाले की, आम्ही मोर्चावर ठाम आहोत. लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार आहे. प्रत्येक खासदार हा लोकशाही पद्धतीने निवडून आलेला आहे. त्यामुळे खासदाराला निवडणूक आयोगात नेऊन त्याची भेट घडवून दिली पाहिजे. राहुल गांधी, प्रियांका गांधींसह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस अटक करणार असले, तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले.

खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “भारतीय निवडणूक आयोग घाबरलेला आहे. ते निवडून आलेल्या प्रतिनिधींना भेटू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. आम्ही मतचोरी प्रकरणी अनेक प्रश्न मुद्देसूद उपस्थित केले आहे. भाजपच्या निर्देशानुसार, मतांची हेराफेरी आणि चोरी होत आहे. त्यावर आम्ही प्रश्न विचारत आहोत. आम्ही चोर आहोत का? आम्ही देशाच्या हिताच्या विरोधात बोलत आहोत का?…”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...