पुणे : समाजसेवा म्हणजे फक्त काम नव्हे…तर ती एक निःस्वार्थ भावना असते. अशा मानणाऱ्या आणि त्यावर काम करणाऱ्या देशभक्त सुनिताताई निंबाळकर यांनी सुरू केलेली आई कलाग्राम फाउंडेशन’ ही संस्था लोकहिताचे अनेक उपक्रम आयोजित करते. त्याचाच एक भाग म्हणून समाजात विविध क्षेत्रात उत्तम काम करून देश सेवा करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी ‘राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा’ आणि ‘ध्यास माझा समाजसेवेचा फॅशन शो’ चे आयोजन येत्या शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४.३० ते ९ या वेळेत कॅम्प येथील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल येथे केले आहे; अशी माहिती कार्यक्रमाच्या आयोजका सुनीता निंबळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी व्यवसाय मार्गदर्शक एस. एस. सावंत, सुनीता धायगुडे, शिल्पा टिकोणे व फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आई कलाग्राम फाउंडेशन ही एक बहुउद्देशीय संस्था असून संस्थेचा आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्यघटून एकूण ४० पुरस्कार देण्यात येणार आहे यामध्ये, सामाजिक संस्था (NGO), कला, क्रीडा, उद्योजक, शिक्षक, कायदा आदी अनेकांचा सहभाग असणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह अशी या पुरस्काराचे स्वरूप असून हे पुरस्कार मित्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योजक किसन भोसले, माईंड पॉवर ट्रेनर व लेखक दत्ता कोहिनकर, व्यावसायिक मार्गदर्शक एस. एस. सावंत सर, उद्योजक प्रकाश नेवसे, समाजसेवक चंद्रकांत पाटील, पुष्पा कटारिया आणि दीपक भोसले आदि उपस्थित राहणार आहे.
समाजामध्ये उत्तम समाजसेवक निर्माण व्हावे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन, आर्थिकबाजूने समाजात सक्षमता वाढावी यासाठी उद्योजक मेळावे व मार्गदर्शन शिबिर, विविध क्षेत्रात उत्तम काम करून राष्ट्राची सेवा करणाऱ्या व्यक्तींना कौतुकाची थाप मिळावी या उद्देशाने फाउंडेशन कार्यक्रम घेत आहेत. शहरातील अथवा ग्रामीण भागातील सामान्य जनतेसाठी, दुःखात सापडलेल्या प्रत्येकासाठी या फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून नागरी समस्या, आदिवासी, धनगर, कातकरी समाजासाठी काम, आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, जनजागृती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महिलांच्या अन्यायाविरुद्ध लढा देणे,जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनांवर मलम देण्याचे काम, गरिबांच्या घराच्या जप्त्या थांबवने, सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्यांना मदतीचा हात देणे, शिक्षणात अडथळा आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व योग्य ती मदत, कायद्याविषयी अज्ञान दूर करत अनेकांना न्याय मिळवून देणे इत्यादी अनेक कामे सुनीताताई यांच्या जीवनाचं मिशन झालं आहे.

