‘मोदी, भागवतांचे नाव घेण्यासाठी मला टॉर्चर केले’: तुरुंगात शारीरिक,मानसिक छळ केला-साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा आरोप

Date:

मुंबई-मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपले अनुभव माध्यमांसमोर कथन केले. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश, रामजी माधव यांच्यासारख्या लोकांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात होता, असा खळबळजनक दावा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. तसेच तुरुंगात माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.माझ्यावर इतके अत्याचार झाले की ते शब्दांत मांडता येणार नाहीत. एटीएस अधिकाऱ्यांनी 13 दिवस बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. या काळात मला ज्या यातना आणि अत्याचार सहन करावे लागले, त्यासाठी शब्द अपुरे आहेत. शब्दांनाही मर्यादा असते, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतर सात आरोपींची निर्दोष मुक्त केले. सरकारी वकिल आरोपीविरुद्धचा खटला सिद्ध करू शकले नाहीत, असे कोर्टाने म्हटले होते. सुमारे 17 हा खटला चालला होता. आज माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उपरोक्त दावा केला आहे.

साध्वी प्रज्ञा पुढे म्हणाल्या, मला नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश, राम माधव यांची नावे घेण्यास भाग पाडले जात होते. ‘तुम्ही या लोकांची नावे घेतल्यास आम्ही तुम्हाला मारणार नाही’ असे अधिकारी वारंवार म्हणत होते. त्यांचा मुख्य उद्देश मला त्रास देणे हाच होता. मला सर्व काही खोटे बोलण्यास सांगितले जात होते, म्हणून मी कोणाचेही नाव घेतले नाही.

या लोकांनी छळ करून माझ्याकडून खूप काही वदवून घेण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही खोटे बोलणार नाही. देशाला घाबरण्याची गरज नाही. देशभक्त आपल्या देशासाठी जगतात आणि मरतात. अनेक एटीएस अधिकाऱ्यांनी कायद्याच्या नावाखाली बेकायदेशीर कामे केल्याचा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी केला. तुरुंगात मला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला, असेही त्या म्हणाल्या.

न्यायालयाच्या निर्णयावर प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, हा भगव्याचा, धर्माचा आणि सनातन धर्माचा विजय आहे. पण यांना पराभूत करण्याची या लोकांमध्ये हिंमत नाही. या लोकांनी छळ करून भगवा आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा कुत्सित प्रयत्न केला. अशा लोकांना शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हा संपूर्ण खटला बनावट होता, त्याला कोणताही आधार नव्हता. सत्य नेहमीच समोर येते आणि सिद्ध होते, या प्रकरणातही तेच झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...