Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुनीत बालन यांचे DJ मुक्त आणि विसर्जन मिरवणुकीबाबत ऐतिहासिक निर्णय…पण आ.रासनेंचे निर्णय ?

Date:

पुणे- आजपर्यंत दरवर्षी गणेशोत्सव झाल्यावर त्यातील त्रुटी,लोकांना होणारा त्रास, मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि धार्मिकता यावर चर्चा होत राहिली पण गेल्या वर्षापासून यात आता बदल होतो आहे. कधी काळी जनक कोण ? टिळक कि रंगारी..असा वाद निर्माण करून आपले राजकीय हित साधून झालेले आता यात अजून तरी दूर आहेत.पण त्यांचेच काही चेहरे आता गणेसोत्सव २४ तास सुरु राहिला पाहिजे यासाठी विधानसभेपासून पुण्यात आणलेल्या आय ए एस अधिकाऱ्यांना या धोरणाप्रमाणे वागायला प्रवृत्त करत असताना पुनीत बालन यांनी यंदा गणेशोत्सवाला चांगली दिशा देण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे दिसले आहे. गेल्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आता बालन यांनी काही निर्णय घेतलेत त्यामुळे आता एकूणच गणेशोत्सवात महत्वपूर्ण बदल होत तो लोकमनावर आरूढ होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने विसर्जन मिरवणूक वेळेत होण्यासाठी २०२३ मध्ये महत्वाचा निर्णय घेतला.दुपारी 4 वाजताच विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायचे हा निर्णय २०२४ लाही कायम होता.साधारणतः जो दगडूशेठ गणपती दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जित होत तेव्हा त्यावेळी सकाळी भाविकांना या गणपतीच्या दर्शनासाठी यावे लागत आणि विसर्जन मिरवणूक २४ तासाहून अधिक काल लांबत.खरे तर हा उत्सव धार्मिक नसून तो सामाजिक आहे हि बाब यात प्रामुख्याने काही लोक अजूनही जाणून आहे. इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्य चळवळीला दिशा मिळायला विचार विनिमय करण्यासाठी एकत्र येण्याची गरज होती, सामाजिक अस्पृश्यता,भेदभाव,देशातील आर्थिक असमतोल, सर्वधर्मसमभाव,एकता,बंधुता आणि समाजाला होणारे उपद्रव थांबविण्यासाठी तेव्हा धार्मिकतेचा आधार देऊन टिळकांनी किंवा भाऊ रंगारी यांनी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले.आणि हा उत्सव सार्वजनिक झाला पण तो सामाजिक हिताचा होता.आता देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे. इंग्रज उरलेले नाहीत पण उत्सव सुरु आहे. पण त्याचे उद्दिष्ट्य जे सामाजिक उत्सवाचे होते ते मात्र पूर्णपणे हरवत चालले आहे आणि आता हा उत्सव राजकीय बनला आहे.येथून नगरसेवक,आमदार,खासदार बनविण्याची फॅक्टरी जणू तो बनला आहे. आणि केवळ हीच फॅक्टरी येथून व्यवस्थित कार्यरत होते आहे. पण ती होत असताना समाजाला होणारे उपद्रव थांबविण्यासाठी हा उत्सव हा हेतू मात्र उत्सव साजरा करणारे बरेच जण विसरू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची,गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची चंगळ होत गेली आणि हेच आपले निवडणुकीतील खरे प्रचारक म्हणून त्यांना बळ देण्यासाठी राज्यकर्त्यांनी त्यांच्या मागे उभे राहणे पसंत केले.आणि याच भावनेतून आता आमदार रासने यांनी २४ तास उत्सव सुरु ठेवा अशी आरोळी विधानसभेपासून गल्लीतील मंडळापर्यंत ठोकली आहे. ज्याने सामाजिकतेची जाणीव न उरलेले कार्यकर्ते हर्षोल्हासात डुंबत आहेत.पण जनतेच्या भावना यात समजून घ्यायला कोणी पुढे येईनासे झालेय.

पुनीत बालन…हे पुण्यातील अलीकडच्या वर्षात पुढे आलेले नाव,जेव्हा टिळक कि रंगारी असा वाद उकरून काढला गेला,त्यानंतर काही काळातच बालन यांचे नाव पुढे आले आणि हा वाद हि शमला,मागे टाकून उत्सवाला रंगत भरायचे काम बालन यांनी सुरु केले,बालन यांचा उत्सवातील आणि एकूणच मंडळांमधील लोकप्रियतेचा चढता आलेख दिसत असताना २०२३ मध्ये दगडूशेठ मंडळाने अगदी योग्य निर्णय घेतला तो विसर्जन मिरवणूक लवकर संपावी म्हणून सायंकाळी ४ वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याचा.त्याचे कौतुक व्हायलाच हवे होते आणि झालेही व आजही सर्वांना आहेच.

आता यापुढे हा उत्सव सरकत आहे. बालन यांच्या नव्या घोषणेने…ती म्हणजे DJ मुक्त गणेशोत्सव..शेकडो नाही तर तमाम पुणेकर( सामाजिकता विसरलेले कार्यकर्ते सोडून ) या निर्णयाचे स्वागतच करतील कानठळ्या बसणारी बीभत्स गाणी तर सोडा पण आरती सुद्धा सुमधुर आणि कानाला भावेल,मनाला भक्तीच्या प्रांगणात रमवेल अशाच आवाजाच्या मर्यादेत हवी यात शंका नाही. आता बालन यांचा हा निर्णय किती मंडळे आचरणात आणतील ते दिसेलच.पण सर्वांनीच आणला तर सुरेख होईल असे पुण्यात राहणाऱ्या रहिवाश्यांना ( सामाजिकता विसरलेले कार्यकर्ते सोडून )नक्कीच वाटत असेल.

एवढ्यावरच पुनीत बालन थांबेले नाहीत तर त्यांना २ वर्षात हेही समजले कि, दगडूशेठ सायंकाळी ४ वाजता मिरवणुकीत येऊनही मिरवणूक लांबते आहेच. या समस्येवर त्यांना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी साथ द्यायचे ठरविले आणि आता अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यावर्षीपासून सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता, मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मी रस्त्यावरून दरवर्षी निघणाऱ्या वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी हे मोठे ऐतिहासिक निर्णय नक्कीच या उत्सवाला चांगली नवी दिशा देणारे ठरू शकतात.

आता यावर त्यांनी खरे तर उत्सवाला सामाजिकतेचे रूप पुन्हा प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहेत असे मान्य केले तर हे निश्चितच या उत्सवाच्या इतिहासात नोंद घेणारे ठरेल.

पण ….

या दोन्ही मंडळांनी या वर्षी मिरवणुकीत लवकर सहभागी व्हायला कारण वेगळे दिले आहे यावर्षी अनंत चतुदर्शी म्हणजे विसर्जनाचा दिवस (दि.६ सप्टेंबर) च्या दुसऱ्या दिवशी (दि.७ सप्टेंबर) खग्रास चंद्रग्रहण असल्याने ग्रहणकाळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे दुपारी १२ पूर्वी मंडळाच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणे आवश्यक्य आहे.असे कारण दिले आहे. हेही इथे लक्षात घेणे गरजेचे आहे.

आणि आमदार रासने यांनी तर २४ तास उत्सव सुरु राहिला पाहिजे अशी भूमिका राबवायला सुरुवात केली आहे ती कितीजणांना मान्य असेल ?

आता DJ मुक्त उत्सव,विसर्जनाच्या दिवसातच मर्यादित वेळेतच होणारे विसर्जन,याबरोबर रस्तोरस्ती सर्वत्र वाहतुकीची कोंडी करणाऱ्या कमानी मुक्त उत्सव केला तर किती बरे होईल.मंडळांच्या समोर १०/१५ मीटर कमानी राहू द्यात..पण शहरभर,उपनगरे भर या कमानी काय चमत्कार करतात हे सर्वांना ठाऊक आहे. तेव्हा उत्सव असा हवा कि लोकांना तो हवाहवासा वाटायला हवा,जरी कार्यकर्त्यांना मेहनत पडत असली तरी तो केवळ कार्यकर्त्यांचे कोडकौतुका साठी नव्हे तर लोकांच्या हितासाठी,समाजाला उपद्रव वाटणार नाही आणि सामाजिक अस्पृश्यता नष्ट करणारा,भेदभाव नष्ट करणारा,देशातील आर्थिक असमतोल दूर करणारा, सर्वधर्मसमभाव भावना तळागाळापर्यंत रुजविणारा,एकता,बंधुता जोपासणारा झाला तर निश्चित तो जागतिक पातळीवर हवाहवासा ठरेल यात शंका नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...