पुणे-हिंजवडी परिसरात विविध विकास कामाची पाहणी करत असताना अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेले, हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना खडेबोल सुनावले आहेत. या परिसरात विकास कामात मुळे बाधित होणाऱ्या मंदिरा संदर्भातला प्रश्न सरपंच गणेश जांभूळकर यांनी उपस्थित केला. यावर अजित पवार यांनी सर्वांसमोर सरपंचाला खडे बोल सुनावले.
धरण करताना मंदिरे जात नाहीत का? मात्र, तुम्हाला जे सांगायचे तुम्ही सांगा, मी ऐकून घेतो. मात्र, मला जे करायचे ते मी करेलच. अहो आपले वाटोळ होत आहे. हिंजवडीचे सर्व आयटी पार्क बाहेर चालले आहेत. माझ्या पुण्यातून आपल्या महाराष्ट्रातून ते बाहेर जात आहेत. बेंगलोरला, हैदराबादला जात आहेत. तुम्हाला इकडे काय पडले? असा प्रति प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. मी सकाळी सहा वाजता पाहणी करायला कशासाठी आलो. मला कळते, ती माझी देखील माणसे आहेत. मात्र हे काम केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
आज पहाटेपासून, पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध स्थानिक समस्या, पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पाची स्थळ पाहणी आणि प्रशासनाकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी अजित पवार यांनी केली. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या.मुख्यमंत्री अजित पवार पहाटेच कामाला लागतात. त्यांची ही खाती सर्व दूर पसरली आहे. आज देखील त्यांनी सकाळी सहा वाजताच हिंजवडी परिसरातील कामाची पाहणी केली. तसेच प्रशासनाला विविध विकास कामांचे आदेश दिले. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहेत. या माध्यमातून कामामध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर 353 कलम लावा, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

